*संत निरंकारी मंडळाच्या वतीने करमाळयात १९५जणांचे रक्तदान*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा करमाळाच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन करमाळा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये कोविड १९चे पालन करून कोविड सदृश्य परिस्थीतीतही एकूण १९५ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर झोनचे ज्ञान प्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन गणेश करे- पाटील, रोहित चौधरी ( API), कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा शिंदे,युवानेते शंभुराजे जगताप, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक शरदराव सावंत, महाराष्ट्र करिअर अॅकॅडमीचे संचालक पांडूरंग वायकर,पशुधन विकासअधिकारी प्रविण शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, टेंभूर्णी ब्रँचचे ब्रँचमुखी अनिल पवार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने केले.
सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मंडळाच्या प्रतिवर्षी होत असलेल्या निष्काम सेवेचे कौतुक केले व युवानेते शंभुराजे जगताप व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक शरदराव सावंत व सर्व बँक कर्मचारी यांनी स्वतःही रक्तदान केले.आतापर्यंत करमाळा शाखेने एकूण 4499 युनिट रक्तसंकलन केले आहे. रक्तसंकलनाचे उत्कृष्ट नियोजन रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व गोपाबाई दमाणी ब्लड बँक सोलापूर यांनी केले. रक्तदात्यांना प्रेरीत करण्यासाठी गावोगावी साध संगत व प्रबंधकांच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती.
यावेळी बोलताना यशकल्यानी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी करमाळा शाखेचे संस्थापक पोपटराव थोरात गुरुजी यांचे विशेष कौतुक करत गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेल्या कामामुळे समाजात अध्यात्मिक जागृती व सामाजिक शांतताप्रस्थापित झाल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कोंडलकर यांनी केले तर सर्वांचे सन्मानार्थ आभार शाखाप्रमुख पोपटराव थोरात यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा