महावितरणने शेतीपंपाचे वीज कनेक्शन न जोडल्यास तीव्र आंदोलन करणार - रणजितसिंह शिंदे
माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
माढा / प्रतिनिधी- मागील आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना व वेळेवर कृषी पंपाची वीजबीले न देता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे ती शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून त्यामुळे फळबागा व पिकांचे नुकसान होत आहे शिवाय जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरण कंपनीने तात्काळ वीज कनेक्शन न जोडल्यास वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिला आहे.
ते माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर सोमवारी बोलत होते.
याप्रसंगी निवेदनाचे वाचन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे यांनी केले.
पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की,शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात कृषी पंपाचे वीज बील भरले होते.कोरोनाच्या संकटामुळे व पाऊस नसल्याने आणि गडगडलेले कृषी मालाचे दर यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे कोणतेही उत्पन्न नाही त्यामुळे शेतकरी सध्या वीज बील भरू शकत नाही.वीज नसल्याने शेतकरी पिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी देऊ शकत नाही त्यामुळे महावितरण कंपनीने तात्काळ वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवून तोडलेले कनेक्शन पूर्ववत करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले की, आपले निवेदन वरिष्ठांकडे तातडीने पाठवले जाईल.जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील म्हणाले की,वीज कनेक्शन तोडल्यामुळे कृषी पंप बंद आहेत त्यामुळे पिके जळू लागली आहेत.विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत तेंव्हा महावितरण कंपनीने त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, आप्पासाहेब उबाळे, उपसभापती धनाजी जवळगे,माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी,दिलीप भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, हनुमंत अण्णा चव्हाण,रामचंद्र भांगे,संभाजी पाटील, माजी उपसभापती उल्हास राऊत, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण,संदीप पाटील,सुभाष नागटिळक,नगरसेवक राजू गोटे, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडूळे,मोहन मोरे,नागनाथ पाटील, सतीश पाटील,दत्तात्रय अंबुरे,अशोक शिंदे,शिवाजी बारबोले,शिवाजी उबाळे,संतोष अनभुले,सरपंच तानाजी लांडगे,राजेंद्र गुंड सर ,संतोष पाटील,दिगंबर माळी,दिपक देशमुख,संतोष लोंढे,अमोल चवरे,दिगंबर इंगळे,रामेश्वर नागटिळक,नानासाहेब बागल, गोपीनाथ गवळी,भारत गायकवाड, सचिन देशमुख,बालाजी सुर्वे,रामचंद्र नवले,अभिमान लोंढे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे बाजूला सुहास पाटील,रमेश पाटील,झुंजार भांगे व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा