Breaking

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय कै. वि.वि. तथा आप्पा पेंडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लोकसहभाग ( ग्रामपंचायत व जलदुत) ज्ञान प्रबोधिनी हराळी, यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ गावामध्ये पर्जन्यमापक देण्यात आले*



*ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय कै. वि.वि. तथा आप्पा पेंडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त  लोकसहभाग ( ग्रामपंचायत व जलदुत) ज्ञान प्रबोधिनी हराळी, यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ गावामध्ये पर्जन्यमापक देण्यात आले*

 व ज्ञान प्रबोधिनी हराळी, ता.लोहारा यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ गावांमध्ये पर्जन्यमापक देण्यात आले. यामध्ये उमरगा तालुक्यातील ३, कळंब तालुक्यातील २ व उस्मानाबाद तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.  नियमित पर्जन्यमानाच्या नोंदी घेण्याची जबाबदारी त्या त्या गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या जलदुत यांनी घेतली आहे. पर्जन्यमापक बसविताना घ्यायची काळजी, नोंदी कशा पद्धतीने घ्यायच्या, घेतलेल्या नोंदीचा उपयोग कशा पद्धतीने करायचे,या विषयी माहिती ज्ञान प्रबोधिनी चे प्रकल्प समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी दिली, यावेळी ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राचे व्यवस्थापक मा. सुहासजी पाठक, उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ गावातील जलदुत व  प्रबोधिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम दुधगाव, ता.जि. उस्मानाबाद येथे झाला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा