*विपश्यना साधकांच्या हस्ते पुरातन चैत्यगृह,तेर येथे वृक्षारोपण*
तेर येथे धम्म पहाट झाली आहे कारण या गावात आता मातंग(प्रेरणेसाठी) समाजाचे तीन विपश्यना साधक आहेत.तेर/तगर हे प्राचीन नगर असून त्याला इसवी पूर्वीचा धम्म इतिहास आहे.त्यातीलच वरील चैत्य आवषेश हा पूरावा आहे.तेथेच माझ्या(साधक) व जोशीला लोमटे(साधक)यांच्या हस्ते 14/8/21 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.धम्माच्या दृष्टीकोणातून ही साधारण घटना नव्हे.धम्म म्हणजे नियमानूसार आचरण/सदाचरण/शील समाधी प्रज्ञा या शिवाय दुसरे काहीही नाही.धम्म/धर्म/निसर्ग नियम बुध्दी वा तर्कावर अभ्यासून फार कांही लाभ होत नाही.म्हणूनच जगातील सर्व मानव दु:खी आहे. सर्वच धर्म/संप्रदाय लोभ द्वेष करू नये,खोटे बोलू नये म्हणजे सदाचारी व्हावे असी शिकवण देतात पण माणूष तसा वागत नाही कारण त्यांच्या मनाला तसेच वागण्याची सवय लागलेली असते.विपश्याना साधना मनाची ही राग(तृष्णा),द्वेष व मोह(भ्रम) करण्याची सवयच बदलून टाकते.मन सबल निरोगी निर्मळ होते.निर्मळ/विशुद्ध चित्ताला योग्य निर्णय,योग्यकृती कींवा सदाचार करण्याची गरज नसते ते आपोआप घडत असते.म्हणूनच शोषणमुक्त व समताधिष्ट समाज घडवण्यासाठी,संविधान अमलासाठी,डाॅ.बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी गोवोगावी,नगरात ,शहरात साधकांची संख्या वाढवली पाहिजे.साधना ही म्हातारपणी केली पाहिजे असा चूकीचा समज पसरविण्यात आला आहे.धम्म/धर्म सर्व मानवासाठी आहे.सार्वकालिक व सार्वदेशीक आहे. साधनेची सर्वात उत्तम वेळ जन्मापूर्विची आहे आईच्या गर्भाशयात.साधकांनी दररोज दोन तास,वर्षातून एक दहा दिवस कोर्स किंवा सेवा आठवाड्यातून एकदा समुह साधना केल्याशिवाय प्रज्ञा विकसीत
होणार नाही त्यामुळे तुमच्या व इतरांच्या जिवनामध्ये मंगलमय परीणाम येणार नाहीत.जोशीला आताच पहिला कोर्स करून आली आहे तिचे हा.अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
विनंती:सोशल मिडियावरिल वादवीवाद व प्रतिक्रितून वेळ काडून यावर विचार करून कृती केली तर सर्वांचे मंगल होईल.
यावेळी सुमेध वाघमारे,लोमटे बिभिषण,बाबासाहेब गायकवाड व अमोल,कानिफनाथ देवकुळे उपस्थित होते,
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा