Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या ४ महीन्यापासून रखडलेले वेतन वितरीत करा, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन*



*आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या ४ महीन्यापासून रखडलेले वेतन वितरीत करा, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन*


 आरोग्य विभागातील सरळसेवा भरती२०२१ गट ( ड ) मध्ये समावून घ्या.
या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांना तहसीलदार सौदागर तांदळे तुळजापूर मार्फत देण्यात आले.
    राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आरोग्य विभागाने कंत्रांटी कर्मचाऱ्यांची भरती केली. कोरोना सारख्या महामारीत यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून रूग्णांना सेवा देवून कर्तव्य बजावले. 
अशा कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमनूक करून कायमस्वरूपी करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी तसेच ज्यांनी ९० दिवसाच्यावरी कर्मचारी म्हणून काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनाने कोरोना कमी होताच वाऱ्यावर न सोडता त्यांनी काढलेल्या गट (ड) सरळसेवा भरती २०२१ मध्ये परिक्षा न घेता सामावून घ्यावे या मागणीसह
गेल्या ४ महिन्यापासूनचे रखडलेले वेतन कंत्राटदाराने त्वरीत वितरीत करावे अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सागर कदम व कंत्राटी कर्मचारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना. राजेश टोपे यांना तहसिलदार सौदागर तांदळे मार्फत देण्यात आले. 
यावेळी अक्षय कदम, बालाजी शिरसागर, मयूर कदम, आण्णा जनार्धन कदम, शंभूलिंग कदम, अभिमान शिंदे, चेतन साबळे, सोहम मस्के, प्रभाकर व्हटकर, आण्णा घाडगे, सौ.कदम, सौ.राऊत , दगडू इनकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा