Breaking

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

खटावकरांनी उपकाराची फेड उपकरांनीच करून दाखवली



खटावकरांनी उपकाराची फेड उपकरांनीच करून दाखवली


वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

        काही वर्षांपूर्वी खटाव-माण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी ओला चारा उपलब्ध करण्याचे काम जावळीकरांनी केली होते. त्या उपकाराची परतफेड खटाव च्या शिवसैनिकांनी उपकरानेच करून दाखवली आहे. 
           याबाबत माहिती अशी की, पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व दरड कोसळण्याचे प्रकार घडल्याने जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. लोकांचे संसार उध्वस्त झाले होते. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व उपनेते प्रा नितीन बानूगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकप्रमुख महेश गोडसे, चंद्रकांत तथा बाळासाहेब जाधव, विभागप्रमुख आबासाहेब भोसले, महिला संघटिका सौ राणी विकास काळे, वडूज शहरप्रमुख सुशांत पार्लेकर व शिवसैनिक यांनी त्वरित खटाव तालुक्यातील दानशूर व्यक्ती यांच्याशी संपर्क साधला. तसेच नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, वडूज व टिलू बागवान मित्र परिवार यांनी ही खटाव तालुक्यात अनेकांशी  संपर्क साधून मदत करण्यासाठी हातभार लावला होता. त्यानंतर  जावळी-महाबळेश्वर येथील तळदेव, केळघर परिसरातील ग्रामस्थांना अंथरुण, कपडे, जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्यासह त्यांनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या उपकाराची काही अंश परत फेड करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला. या मानवता भावनेतून केलेल्या मदतीबद्दल जावलीकर तसेच जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनी मनापासून आभार मानले. 
          एक महिनाभर पुरेल एवढे धान्य साहित्य देण्यात आले. तेलापासून ते मीठा पर्यंत आवश्यक वस्तू मिळाल्याने संकटग्रस्त ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. सदरचे साहित्य वाटप करण्यासाठी जावळीचे सेना नेते एकनाथ ओंबळे, शिवसैनिक बाळासाहेब शिर्के, संतोष बेलोशे तसेच वडूज येथील मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती, वडूज व्यापारी संघटना, जितेंद्र गोडसे, आकाश माने, किरण शिंदे, रविराज गोडसे, शुभम गायकवाड, प्रतिक गोडसे, आशुतोष साळुंखे, नितीन जगदाळे व विविध समाज घटकांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे मानवता भावनेतून गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मदत झाली. अशी भावना जावळीचे  शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ व तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा