*नांदेड जिल्ह्यातील झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा भिम अण्णा सामाजिक संघटनेचा तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध*
नांदेड जिल्ह्यातील गऊळ गाव तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मातंग समाज मंदिराच्या नियोजित जागेमध्ये बसवण्यात आला होता पण या गावातील गावगुंड जमीन माफीया व राजकीय समाजकंटक कुरुरवादी दहशत निर्माण वादी DYSP कांबळे यांनी आपल्या वर्दीचा दुरुपयोग करून गऊळ गावातील मातंग समाजाच्या प्रत्येक घरात घुसून महिला सह सर्वांना बेदम मारहाण केली त्यासंदर्भात त्या गावगुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी यासंदर्भात निवेदन भिम अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे संस्थापक सल्लागार समिती प्रमुख अशोक जाधव, जयराज क्षिरसागर, आकाश शिंदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष किसन देडे, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर,अभिमान सगट, विकास भिसे, दिनेश क्षिरसागर,राम कांबळे, बाळू क्षिरसागर,विकास जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा