Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

राष्ट्रीय सेवा योजना माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी - प्रा शेषराव माने*




*राष्ट्रीय सेवा योजना माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी - प्रा शेषराव माने*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

उठ तरुणा जागा हो राष्ट्रीय सेवा योजनेचा धागा हो.राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य आहे की NOT ME BUT YOU ( माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे) राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना 24 सप्टेंबर 1969 रोजी देशातील 37 विद्यापीठात तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ.वी.के.आर.वी.राव  ने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षापासून सुरू झाली आहे कारण महात्मा गांधीजींचे म्हणणे होते की देशात युवकांच्या संख्या 65 % टक्के आहे त्यामुळे त्यामुळे देशाची सेवा हे युवकच करू शकतात. असा त्यांचा आग्रह होता. यामुळेच देशातील युवा शक्तीला नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ची निर्मिती झाली आहे या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यासाठी युवक हा मोलाचा घटक आहे त्यामुळे तरुणाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणे सहज सोपे जाते.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकका मध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय भावना निर्माण केल्या जाते. हे कार्य देशातील संबंध महाविद्यालयातून होत असते एकदा रासेयो स्वयंसेवकात राष्ट्रीय भाव व समाजसेवेचे जाणीव निर्माण झाल्याने स्वयंस्फूर्तपणे म्हणतोय माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी......NOT ME BUT YOU
राष्ट्र जडणघडणीमध्ये राष्ट्र उभारणी कार्यात नव तरुणआईचे महत्वपूर्ण योगदान आहे. रासेयो सेवकांमध्ये त्यागाची, राष्ट्रभक्तीची भावनाअविरत प्रवाहमान आसते. राष्ट्रीय सेवा योजनेचा बॅच ओरिसा येथील कोनारक मंदिरातील चक्र ज्यात अष्ट प्रहर आठ आरी म्हणजे दिवसाचे चोवीस तास सेवाभाव ठेवण्यासाठी व लाल रंग हा त्यागाचे प्रतीक आहे तसेच लालरंग तरुणाईचे सळसळते रक्त होय. बँच च्या बाहेरच्या बाजुला गडद निळा रंग आहे जो विश्वव्यापक तेचा विश्वबंधुतेचा वसुदेव कुटुंबकम् व शांतीचा संदेश देतो.  राष्ट्रीय सेवा योजना सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी आपले योगदान देण्याचे कार्य करते.
NOT ME BUT YOU माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रीय सेवेचे मूल्य आणि सामाजिक सेवा व्रत धारण करून आपले उज्वल भविष्य गाठत असताना समाजाचे व राष्ट्राचे काही देणे लागते म्हणून फूल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून प्रत्येक स्वयंसेवकांनी राष्ट्र सेवा करण्याचे कार्य महाविद्यालयात व महाविद्यालया बाहेर सतत करत असतात.
राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते.
महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, गड्डे खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद्बबोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.
स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.
राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. पर्यावरणासंबंधी वृक्षारोपण, ग्रीन ऑडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, निर्माल्य संकलन, जलसाक्षरता, समाजाप्रती कन्यारत्न वाचवा अभियान, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक सर्वेक्षण आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे.
कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मागास भागात धान्य वाटप मास्क वाटप तसेच कोरोना जनजागृती अभियान राबविले आहे. त्याच बरोबर  लोकसभा,विधानसभा पंचायत राज निवडणुकीच्या मतदान जागृती अभियानात राष्ट्रीय  सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मतदानाचा टक्का निश्चितच वाढवला आहे व मतदान हे सद्सद्विवेक बुद्धीने केले पाहिजे अशी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली आहे. एन एस एस देशाची अनमोल परंपरा आहे आणि स्वयंसेवक मानवतेचे खरे पुजारी आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.



                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा