अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी महसूलने चुकीचे पंचनामे करून नुकसान कमी दाखवले - खामसवाडी ग्रामस्थांचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना १ हजार सह्याचे निवेदन.
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून झालेले पंचनामे झालेल्या नुकसानीपेक्षा कमी दाखवल्याने शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे व प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा अत्यंत कमी असल्याने महसूल विभागाकडून शेतकऱ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी खामसवाडी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना १ हजार सह्याचे निवेदन दिले
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीनसह इतर पिके पशुधन तसेचबऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे
खरीप पीक पेरणी अहवालानुसार २ हजार ६४१ हेक्टर जमीन खामसवाडी गावातील सोयाबीनचा पिक पेरा असून या पिकपेरा प्रमाणेच मदत देण्यात यावी तसेच सोयाबीन व अन्य पिकांचे विमा कंपनी कडून होणारे पंचनामे झाले नाहीत तरी सरसकट नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली
हे निवेदन खामसवाडी ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना कळंब तालुका उपप्रमुख अमोल पाटील यांनी दिले यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा