चक्क महामंडळाच्या एस.टीतून अकरा टन रेशनचा माल पकडून चार दिवस झाले गुन्हा नोंद नाही...*
*बार्शी डेपोचे अधिकारी तुपाशी कर्मचारी चार दिवस उपाशी... सर्वांच्या अटकेची नागरिकांची मागणी*
*प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?गौडबंगाल कळेना...* *"भातलवंडे"चा भात पालीला पोहचण्याच्या आधीच हायवेला लवंडला...उलट सुलट चर्चेला उधाण...*
कुर्डूवाडी प्रतिनिधी/ अरुण कोरे यास कडून
AJ 24 Taas News Maharashtra network
*रेशनचा तांदुळ पकडून चार दिवस झाले तरी गुन्हा नोंद न झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*बार्शी आगाराच्या एस.टी.च्या मालवाहतूक करणाऱ्या वहानातून बार्शी तालुक्यातील रेशनचा दहा टन ७०० किलो तांदूळ पालीला जाण्यासाठी बुक करण्यात आला होता असे विश्वसनीय रित्या समजते.*
*हा तांदूळ भरलेली महामंडळाची मालवाहतूक करणारी एस.टी. नंबर एम.एच./बी.टी./०२१८ बार्शीतून पालीला जाण्यासाठी सोमवारी भरण्यात आली होती.ती भरदिवसा राजरोसपणे येऊन पुणे हायवेला लागल्यावर कर्माळा विभागीय अधिकारी विशाल यांच्या टीमने व टेंभुर्णी पोलिस खात्याने पकडली.*
*या गाडीचे दोन चालकापैकी एक भातलवंडेचा भात तयार होण्याच्या आधीच हायवेला लवंडला.*
*याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.*
*कोरोनो काळात एस.टी.च्या मालवाहतूकीचा केलेला डांगोरा चोरीच्या मालवाहतूकीसाठी होणारा दुरुपयोग चव्हाट्यावर आल्याने बार्शी,माढा व करमाळा तालुक्यात एकच चर्चेचा विषय झाला आहे.*
*एस.टी.सह सर्व अधिकारी तुपाशी असताना कुणी काय माल भरला? माहीत आहे की नाही त्यांनाच माहीत.ते मात्र ठाण्याच्या तावडीत पदरखर्चाने उपाशी मरत आहेत.भितीपोटी या कर्मचाऱ्यांच्या जिवीताचे काय झाले तर त्याला कोण जबाबदार?असा प्रश्नही उभा ठाकला आहे.*
*याबाबत अधिक चौकशी करता असे समजते की, बार्शीच्या आगारातील अधिका-यांना हाताशी धरून एक कर्मचाऱ्यांची टोळी तयार झाली आहे.एस.टी.तून जाणारा माल कुणी चेक करत नाहीत याचा गैरफायदा घेऊन गेल्या वर्षभरापासून बार्शीच्या मार्केट यार्डात माल लपवून एस.टी.तून गायब केला जातोय.*
*बार्शी तालुक्यातील पानगावचा एक "बाबा"नामक एस.टी.कर्मचारी जो प्रत्यक्षात चालक आहे पण चोरीचा माल लंपास करण्यात तो सोकावला असल्याने त्याला अधिकार नसताना बेकायदेशीरपणे माल वहातुकीचा माल लंपास करण्यासाठी अनधिकृतपणे नेमण्यात आले आहे.त्याचा एक साथीदार असून त्यालाही वाय"चळ" लागलाय.गेल्या वर्षभरापासून एस.टी.च्या मालवाहतूकीतून अनधिकृत नावांवर कोणता कोणता माल लंपास झाला याचा पोलीस तडा लावणार की हेराफेरी करणार? याबाबत नागरिकांबरोबरच एस.टी.खात्यातही जोरदार चर्चा सुरू आहे.*
*याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता रेशनचा दहा-अकरा टन तांदूळ असलेली मालवाहतूक एस.टी.नंबर एम.एच१४/बी.टी/०२१८ ही पोलिस ठाण्यात असल्याचे सांगितले जाते पण त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचेही सांगितले जाते.चार दिवस झाले चौकशीत निष्पन्न काय झाले? गुन्हा नोंद का नाही? चालकांना अनधिकृतपणे ठाण्यात का डांबून ठेवले?अशी विचारणा केली तर तपशील आम्हाला माहीत नाही अधिका-यांनाच विचारा असे सांगितले जाते.अधिकारी चिडीचूप असून सर्वांची खलबते पहाता हेराफेरी करण्याचें सुरू असल्याचे समजते.एवढेच नव्हें तर रेशन ऐवजी दुसरें काय शक्कल लढवता येते कां?याची चार दिवसांपासून चाचपणीही सुरू असल्याचे समजते.*
*बार्शी आगाराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी तातडीने करावा तातडीने गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा