*तुळजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे,थकलेले ऊस बिल द्यावे या मागणीसाठी सोलापूर येथे सुरु असलेल्या उपोषणास भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा*
अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्यांनी ऊस बिल द्यावे या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील सुमारे २००, शेतकरी तुळजापूर तालुका शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली, दि,२७ ऑक्टोंबर २०२१, पासून काँग्रेस भवन सोलापूर येथे अमरण उपोषण करत आहेत तरी सदर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याला व शेतकरी संघटनेला तुळजापूर तालुक्यातील भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, आजच्या काळात धनाढे साखर कारखाने शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे देत नाही तरी शेतकर्यांचे जगणे मुश्कील झाले आहे, सदरील अक्कलकोट येथील मातोश्री साखर कारखानदारांणी शेतकऱ्याचे थकलेले उसाचे बिल त्वरित द्यावे, या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे, यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे, धर्मराज देडे, महादेव मोरे महाराज, अनिल मोरे, आदी यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा