आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीपीची शक्यता
२- आजसहीत पुढील ३ दिवसात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातुन बाहेर पडणार.
३- दक्षिणेतील सर्व राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर अधिक असुन तेथील काढणीस आलेल्या आगाप लाल कांद्याचे जबरदस्त नुकसानीची शक्यता जाणवते.
४- नंतरचे तीन दिवस (१७-१९ ऑक्टोबर) दरम्यान विदर्भ मराठवाड्यात अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात साधारण विजांचा कडकडाट व गडगडाटासहीत पावसाची शक्यता असुन ह्या पावसाचा अंदाज घेऊनच २० ऑक्टोबर नंतरच पूर्ण वापस्यावर रब्बी(उन्हाळ)[गावठी] कांदा 'उळे ' टाकण्यास तसेच पुढील टप्प्यातील द्राक्ष छाटणी करण्यास हरकत नाही, असे वाटते.
कारण दरम्यानचा होणारा पाऊस हा धोपटण्या स्वरूपाचा व जमिनीत उष्णता दाबून ठेवणारा असु शकतो.
५- जपून ठेवलेला भविष्यातील विक्रीयोग्य चाळीतील उन्हाळ कांदा काही झाले तरी पलटी करून ठेवणेच योग्य ठरेल
६- पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील कमाल/किमान तापमान सामान्य असुन अति गारवा, किंवा चक्रीवादळाचा धोका सांगणाऱ्या बातम्याकडे दुर्लक्ष करा.
७- एकाकी वातावरणात काही बदल झाल्यास लगेचच कळवले जाईल.
सध्या एवढेच!
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा