गरिबांच्या घराला नांगर लावाल तर आमच्याशी गाठ - शहाजीराजे गोडसे
शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे गुरसाळे येथील घरांबाबत समन्वयातून निघाला तोडगा
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गुरसाळे ता.खटाव येथे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे काही गरीब नागरिकांची घरे कोणताही विचार न करता घरे पाडण्याचा फतवा प्रशासनाने काढला होता. परंतु येथील कुटूंबियांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन जर येथील गोरगरीब, शेतकरी, मजुरांच्या घराला हात लावाल तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा वडूज नगरपंचयातीचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यानी दिल्यानंतर,प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढत कोणत्याही घराची मोडतोड न करता रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन शहाजीराजे गोडसे यांना दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्या राज्य मार्ग क्र.१४७ या रोड रुंदीकरणचे काम सुरू आहे. या रस्त्यावर गुरसाळे गावात सिटी सव्हेला नोंद असणाऱ्या गरीब नागरिकांची घरे आहेत. दोन्ही बाजूला दीड फूट सोडून चाळीस फुटाचा रस्ता होऊ शकतो. यामध्ये रस्ता रूंदीकरणाला कोणताही अडथळा होत नाही. परंतु काहींनी जाणून बुजून घरे पडण्याचा कट रचला होता. याबाबत येथील नागरिकांनी शिवसेनेचे वडूज नगरपंचयात विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांच्याकडे धाव घेत त्यांना आपली कैफियत सांगितली.
यावर शहाजीराजे गोडसे यांनी तातडीने शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, विभाग प्रमुख आबासाहेब भोसले, सुधीर माने आदि सह गुरसाळे जाऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना यांच्याशी संपर्क साधून यावर तोडगा काढा,नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला यावर लगेच अधिकाऱ्यांनी धसका घेत यावर योग्य ती उपाययोजना करत काम केले जाईल असे आश्वासन दिले.
शहाजीराजे गोडसे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर लगेचच गुरसाळे येथील जनतेला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त होत असून येथील अनेक युवक लवकरच शिवसेने मध्ये प्रवेश करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा