आहेरगाव येथे विधी सेवा समितीच्या वतीने मार्गदर्शन
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील मौजे आहेरगाव येथे तालुका विधी सेवा समिती माढा यांच्या वतीने गावातील तंटे गावातच मिटविले जावेत या अनुषंगाने अड एस.एच अजगर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सरपंच सुभाष पाटील,आबा सुर्वे,प्रगतशील बागायतदार रामभाऊ पाटील,जालिंदर पवार,गणेश अजगर,बबलू अजगर,आकाश अजगर,अक्षय अजगर,नाना पवार,रामकृष्ण अजगर,दादा जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अड एस.एच अजगर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,गावातील खटले लोक न्यायायातच मिटविले जावेत,यामुळे पैशाची,वेळेची बचत होते.आपापसातील संबंध चांगले राहतात.गावात सौहार्दपूर्ण वातावरण राहते.संबंध सुधारतात.वैर भावना कमी होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होते.यामुळे जास्तीत जास्त खटले गावातच मिटवावेत असे शेवटी आवाहन केले.
यावेळी सुभाष पाटील,निलेश अजगर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शेवटी आभार निलेश अजगर गुरुजी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा