कर्मयोगी सहकारी कारखाना येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासंदर्भात काटाबंद व गव्हाण बंद आंदोलन;
सोलापूर सरचिटणीस राजकुमार सरडे यांनी केले ३०० ते ४०० लोकांचे प्रतिनिधित्व
कंदर: परिसरातील ऊस पुरवठादार यांच्या मागील
२०२०-२१ हंगामामध्ये गळितास आलेल्या ऊस बिलाची काही रक्कम देय आहे. या संदर्भात कंदर ता.करमाळा येथील सोलापूर जिल्हा रयतक्रांती संघटनेचे सरचिटणीस राजकुमार सरडे यांनी करमाळा, कर्जत, माढा आणि इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनासाठी नुकतेच कर्मयोगी सहकारी साखर कारखाना येथे काटाबंद, गव्हाण बंद आंदोलन करून चार ते पाच तास शेतकऱ्यांनी कारखाना बंद पाडला.
सहा ते सात महिने झाले ऊस गळितास आलेला असून अद्यापपर्यंत ऊस बिलाची पहिली उचल शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी व सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे यांनी या आंदोलनाची प्रतिनिधित्व केले. शेतकऱ्यांचे तीनवेळा चेक बँकेत भरून चेक बाँन्स झाले आहेत. गोड बोलून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ऊस बिल न देता २०२१-२२ गळीत हंगाम सुरू केला आहे. या कारखान्याला गळीत परवाना मिळालाच कसा हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे. ऊस बिल जमा नाही केल्यास पुढील कारवाईसाठी साखर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.असे सांगण्यात येत आहे. एफआरपी संपूर्ण दिल्याशिवाय कारखाना चालू झाला कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सदर रक्कम येत्या १५ तारखेला नोव्हेंबर मध्ये संबंधित बँक खात्यावर जमा करण्यात येईल अशा आशयाचे पत्र कार्यकारी संचालक कर्मयोगी सहकारी कारखाना यांनी सरचिटणीस राजकुमार सरडे यांच्याकडे दिले.
यावेळी ३०० ते ४०० शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा