प्रत्येक गावात आशासेविका व जेष्ठांचा सन्मान होणे गरजेचे आहे - डॉ दिलीपराव येळगावकर
वडूज प्रतिनिधी - शरद कदम
कोरोना काळात शासनाच्या व आरोग्य विभागाच्या आदेशानुसार कामकाज करत असताना आशा स्वयसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, कर्मचारी यांनी कोरोना काळात अहोरात्र परिश्रम घेतले असून प्रत्येक गावात यांचा व जेष्ठांचा सन्मान होणे गरजेचे आहे असे मत माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केले.
भुरकवडी ( ता. खटाव ) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्रालयाचे कक्षअधिकारी प्रविण लावंड, सरंपच ललिता कदम, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, मा.सरपंच एस के कदम सर, सोसायटीचे मा.अध्यक्ष शरद कदम, छगन कदम, सुखदेव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री येळगावकर म्हणाले, कोरोना काळात गावपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत स्थानिक कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. तर महामारीवर मात करून जेष्ठ नागरिकांनी नव्या पिढीला उमेद देण्याचे काम केले आहे. प्रत्येक गावाने अश्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. यावेळी प्रविण लावंड, शरद कदम यांचीही मनोगते झाली.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रा.प. सदस्या शितल कदम यांनी केले. रंजना कदम, सुजाता गाढवे यांनी स्वागत केले. आभार रेश्मा कदम यांनी मानले. यावेळी कोरोना योद्धा म्हणून आरोग्य सेविका स्मिता जंगम, आशा स्वयंसेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनिषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, ग्रा.प. कर्मचारी संजय कदम, नितीन कदम, गणेश कदम, आजी - माजी सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, पत्रकार शरद कदम, अनिकेत जाधव, निशांत नवले यांच्यासह जेष्ठांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.प. सदस्या मनिषा कदम, सुलोचना कुंभार, भिमराव कदम, शिवाजी कदम, मधुकर कदम आदि सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा