ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाले बद्दल सन्मान-
बेंबळे।।
मा.श्री.तात्यासाहेब रामदास पाटील-ग्रामविकास अधिकारी,पिंपळनेर यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड झालेबद्दल व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेबद्दल विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रंसगी प्रोसेस मॅनेजर पी.एस.येलपले, मार्केटींग ऑफिसर गणेश नायकुडे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर,प्रशासन प्रतिनिधी शशिकांत पवार, खंडू सुरवसे, शिवाजी पेटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री.तात्यासाहेब पाटील हे सध्या पंचायत समिती कुर्डूवाडी अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळनेर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामसेवक पदावर नियुक्ती झाल्यापासून आजअखेर तालुक्यातील रिधोरे,पापनस,निमगां(टे) व पालवण या गावी सर्व शासकीय योजना व अभियाने प्रभावीपणे राबवून गावांचा सर्वागीण विकास अत्यंत चांगल्या पध्दतीने साधलेला आहे. त्यामुळे वरील सर्व ग्रामपंचायतींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरीव विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.त्यांच्या या कामाची दखल शासन दरबारी घेण्यात आली असून त्यांची राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी यापूर्वी ग्रामसेवक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून 10 वर्षे काम पाहिले असून ग्रामसेवक संवर्गाच्या प्रश्नाबाबत जिल्हा व राज्य पातळीवर केलेल्या कामाची दखल घेत त्यांची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा