Breaking

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

कोणत्याही पिकाचे उत्पन्न वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्याची काळाची गरज - हरीश पवार





कोणत्याही पिकाचे उत्पन्न वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब  वाढवण्याची काळाची गरज - हरीश पवार




कन्हेरगाव (प्रतिनिधी)
         जमिनीत कोणत्याही तज्ञ पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय  कर्ब वाढण्याची काळाची गरज असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर जास्त प्रमाणात करून जमिनीचा पोत  वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ॲडव्हान्स पेस्टीसाईडचे महाराष्ट्राचे हेड हरीश पवार यांनी केले.ते श्रीषैल कृषी केंद्र कन्हेरगाव व ऍडव्हान्स पेस्टिसाईड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमात बोलत होते.
         यावेळी पुढे बोलताना म्हणाले की ज्यामध्ये आता नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर होण्यास सुरुवात झाली आहे अशा महागाईच्या काळात शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज राहणार असून त्यासाठी ॲडव्हान्स पेस्टिसाइड चे सेंद्रिय उत्पादने वापरणे काळाची गरज राहणार आहे आपल्या परिसरांमध्ये द्राक्षे,डाळिंब, केळी,ऊस आदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पण प्रयत्न करणे गरजेचे आहे.शेतामध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी खराब होत चालले असून क्षारांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचे आवाहन हरीश पवार यांनी केले.
         यावेळी एरिया सेल्स मॅनेजर विकास येलपले, रिजन सेल्स मॅनेजर योगेश शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य रामलिंग खोचरे,गणेश पाणी पुरवठा  संस्थेचे संचालक किरण खोचरे,रतिलाल केदार,नागनाथ खोचरे, महेश खोचरे, दादासाहेब डोके,नवनाथ डोके,आप्पा डोके,गणेश मोरे,चंद्रकांत डोके,विष्णू डोके,गणेश डोके,गणेश शिंदे,रमेश मोरे,साजन केदार,जयंत डोके, नागनाथ माने,किसन भोसले,मोहन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी आभार श्रीशैल्य कृषी केंद्राचे मालक रतिलाल केदार यांनी मानले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा