तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संमतीने प्रमाणपत्राचा सावळा गोंधळ
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : कोविड-१९ जीवघेण्या साथीचा आजारावर मात करण्याकरिता जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना किनवट तालुक्यात मात्र लसीकरणात मोठा सावळा गोंधळ दिसून येत असून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा आजार गंभीर रूप धारण करून ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरणार यात शंका नाही.
याबाबत अधिक वृत्त असे की, गत दोन वर्षापासून कोविड १९ या साथीच्या आजाराने जगभर थैमान घातले आहे. यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, मोठमोठ्या महासत्ता या आजारा पुढे हतबल दिसत असताना भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. त्यामुळे शासन स्तरावर प्रत्येक नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, लोकांचे मोफत लसीकरण करण्यात येत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह प्रशासन राबत आहे.काम अत्यंत स्तुत्य आहे, याची सर्व स्तरातून दखल होत आहे. परंतु या कामांमध्ये ही मोठा सावळागोंधळ उघडकीस येत असून गंभीर प्रकारामुळे मूळ उद्दिष्टाला तिलांजली मिळत असल्याचे चित्र सध्या तरी किनवट तालुक्यात बघावयास मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये किनवट तालुका विकासाच्या बाबत जसा मागासलेला आहे तसा लसीकरणाच्या बाबतही मागासलेला असल्याने जिल्हा प्रशासनाचे किनवट कडे विशेष लक्ष असूनही किनवट मध्ये मोठा सावळागोंधळ बघावयास मिळत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी हे लस न देताच लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देत असल्याचे गंभीर प्रकार उजेडात आला आहे. तर ऑनलाईन नोंदणी प्रकरणातही मोठा सावळागोंधळ आहे. तेथे एक लस घेतलेल्यांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्या जात आहेत. एक डोस घेतलेल्यांना दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. लसीकरण मोहिमेत राबविलेल्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कार्यवाही होऊ नये व संबंधित वर्तुळातील वरिष्ठा करून शाबासकी मिळवण्याकरिता व सत्कार स्विकारण्या करता सदर प्रकार करण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे. असे असल्यास प्रकरण गंभीर आहे. याचाच भाग म्हणून दिगडी (मंगा) भागात कर्तव्यावर असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना या प्रकरणी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी हा प्रकार घडला असल्याची कबुली दिली. परंतु संबंध खापर ऑनलाईन नोंदणी व्यवस्थेवर फोडून संबंधित आरोग्य कर्मचारी, अधिकारी मोकळे होत आहेत.बोलताना त्यांनी आपणाला परिसरात लसीकरण यशस्वी बद्दल पुरस्कारही मिळाल्याचे आवर्जून सांगण्यास ते विसरले नाहीत. परंतु जर अशा कामाकरिता पुरस्कार मिळू लागले तर जीवघेण्या साथीच्या आजारावर नियंत्रण केवळ कागदोपत्रीच मिळेल यात शंका नाही. तर एकीकडे शंभर कोटी लसीकरण झाल्याचे सांगण्यात येत असताना प्रत्यक्षात मात्र काय ? यावरही प्रश्नचिन्ह आहे. दिगडी (मंगा) सारखे गंभीर प्रकार संबंध तालुका बरही असू शकतात यात शंका नाही. कोरोना काळात योद्धा म्हणून ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्याकडून अशा संतापजनक प्रकाराची अपेक्षा खरोखरच कोणी करणार नाही. प्रकरणाची गंभीर चौकशी होण्याची गरज असून यामध्ये दोषींवर दंडात्मक कार्यवाही होणे आवश्यक आहे अशी मागणी जनतेमधून ऐकावयास मिळत आहे.
यावेळी सदर प्रकरणात बाबतीत तालुका आरोग्य अधिकारी श्री मुरमुरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असल्याचे असल्याचे सांगितले चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही शेवटी म्हणाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा