Breaking

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुधाराअन्यथा आंदोलन करण्याचा भाजपाचा इशारा - डॉ.वैभव माने



वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुधारा
अन्यथा आंदोलन करण्याचा भाजपाचा इशारा - डॉ.वैभव माने 

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

        वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुधारा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.वैभव माने व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी जयवंत पाटील, प्रा.अजय शेटे सर, विक्रम रोमन, रविंद्र पवार, मोहन बुधे, अजित पवार, अजित घाडगे, सुधिर पवार, हरी पाटील आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
            दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खटाव तालुक्यातील शेतकंऱ्यांना कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कसल्याही प्रकारचा बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अवकाळी पाऊस तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटांना सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांना राज्य सरकार कसल्याही प्रकारची मदत न करता उलट वीज वितरण कंपनी वीज बिल भरण्यास तगादा लावत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. उरलीसुरली पिके वीज कपात तसेच कनेक्शन कट केल्यामुळे जळून जात आहेत. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ज्या भागातील लाईट बिले थकली आहेत त्यांना बिले भरण्यास तगादा लावत आहेत. सद्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून वीजबिल भरले नाही तर अधिकारी डी पी कनेक्शन कट करीत आहेत. एकतर शेतकऱ्यांना १० तासाची लाईट दिली जात होती ती कपात करून ८ तासांवर आणली असून त्यातच ८ तासातील सुमारे २ तास कमी दाबाच्या पुरवट्यामुळे वीज खंडित होत असते. उरलेल्या वेळेत शेतकऱ्यांना आपली पिके सांभाळताना नाकीनऊ येत आहे तरी शेतकऱ्यांना वीज पुरवठा संपूर्ण दाबाने १२ तास करावा. सरकारने शेतकऱ्यांना संकटात टाकले असून त्यांना आता आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरला नाही. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा असताना तो संकटात असताना हे सरकार या प्रश्नावर तोडगा काढण्या ऐवजी सक्तीची वसुली करत आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे असे निवेदनात नमूद केले आहे. 
         या सरकारने येत्या १० दिवसात  शेतकऱ्यांची लाईट बिले माफ करून वीज कनेक्शन तात्काळ सुरु न केलेस आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सचिन काळे, सुनिल काळे, माणिक बरकडे, तानाजी भिसे, विलास भिसे, अजित काळे, राजेश काळे, गणेश बरकडे, आकाश काळे, अक्षय काळे, संपत माने, तानाजी फडतरे, लव्हाजी फडतरे, राजाराम फडतरे, सुनिल माने, जगदीश झेंडे, पांडुरंग माने, भानुदास बरकडे, संजय बरकडे, दिलीप जाधव व शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा