*कोरोना नसलेल्या भागातील शाळा सुरू करा- शंकर पोळ*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
ज्या गावांमध्ये कोरोना पेशंट नाहीत त्या भागातील शाळा सुरू
करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी केली आहे . या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे, शहराध्यक्ष वैभव माने, अण्णासाहेब पाटील महाराज आदी उपस्थित होते.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,आता राज्यांमध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्वच माध्यमाच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत परंतु आमचे असे म्हणणे आहे की ज्या भागात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये एकही कोरोना पेशंट सापडत नाहीत किंवा सापडले नाहीत अशा भागात शाळा सुरू ठेवाव्यात .शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
आपण ग्रामीण भागाचा विचार करून अशा शाळा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी .या शाळा निश्चितच कोरोणा चे सर्व नियमांचे पालन करतील तसेच शाळा सुरू ठेवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासन किंवा ग्रामपंचायत यांना द्यावे .जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत .सद्य परिस्थितीमध्ये सरसकट शाळा बंद करणे उचित ठरणार नाहीत .त्यामुळे आपण आमच्या या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून त्यावर अंमलबजावणी करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा