*चव्हाणवाडी(टें)येथे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*
स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. जिजाऊंचे ज्वलंत विचार, संस्कार अत्यंत प्रेरणादायी आहेत.
महाराष्ट्राच्या मातीला आजवर अनेक महान मातांचा सहवास लाभला. पण, आऊसाहेब जिजाऊ यांचे मातृत्व महाराष्ट्राला एक निराळी दिशा प्रदान करणारे आहे. आदर्श पुत्र कसा घडवावा ते फक्त जिजाऊंकडे पाहूनच कळते.या महान मातेच्या प्रति अखंड कृतज्ञ राहून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया.
*माढा तालुक्यातील चव्हाणवाडी टें येथे राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन लहान मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान नांगरेवस्तीचे शशिकांत नांगरे, समाधान नांगरे, मंगेश इंदलकर, निलेश पवार, शुभम नागरे, गणेश रायचूरे इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा