Breaking

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी संकटात ; संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार- अमित घोगरे**करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*


*खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी संकटात ; संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार- अमित घोगरे*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून सरकारने खतांच्या किमती तात्काळ कमी कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे यांनी दिला आहे.खत दरवाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, तालुका सचिव गणेश डोके आदी उपस्थित होते.
         याबाबत प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी शेतकऱ्याला खराब हवामान, अतिवृष्टी, तसेच शेतमालाच्या बाजारभावातील अनियमितता आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सर्वच बाबतीत उदासीनता आहे. यावर्षी   खतांच्या किमतीत  एक गोणीमागे 300 रुपयांची वाढ झाली आहे. उसाच्या एफआरपी फक्त 50 रुपयांची वाढ झाली आहे. खराब हवामानामुळे कीटकनाशके जास्त प्रमाणात फवारावी लागत आहे. शासनाच्या या तुघलकी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून शासनाने खतांची दरवाढ त्वरित मागे घ्यावी  अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा