Breaking

रविवार, १६ जानेवारी, २०२२

रायगड रोप वे ची मनमानीवाढत्या दरांमुळे शिव भक्तांन मध्ये नाराजीरायगड प्राधिकरणाची रोप वे ची घोषणा हवेतच



रायगड रोप वे ची मनमानी
वाढत्या दरांमुळे शिव भक्तांन मध्ये नाराजी
रायगड प्राधिकरणाची रोप वे ची घोषणा हवेतच

महाड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगड पाहण्यासाठी देश विदेशा सह राज्याच्या कान्या कोपऱ्यातून दर रोज हजारो शिव भक्त रायगड किल्ला पाहण्या साठी येत असतात रायगड च्या पायथ्याशी हिरकणी वाडी येथे रायगड रोप वे असून अनेक शिवभक्त किल्ल्यावर जाण्या साठी रोप वे चा वापर करतात परंतु रायगड रोप वे च्या मणमानी वाढीव दरा मुले शिव भक्तां मध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी आणि समाधी स्थळा वर दर रोज मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल होतात वयोवृद्ध आणि लहान मुलांना तसेच विद्यार्थ्यांना रायगड किल्ले दर्शन व्हावे ह्या हेतूने शासनाने रायगड रोप वे चा प्रकल्प मंजूर केला होता त्या नुसार रायगड रोप वे ची उभारणी करणारी कंपनी आणि शासन यांच्यात करार होऊन सुरवातीची दहा वर्षे कंपनीने रोप वे चालवल्या नंतर करारा नुसार शासना कडे हस्तंगत करणे आवश्यक होते. शैक्षणिक सहली आबाळ वृद्ध व्यक्ती , महिला यांना अल्प दारात रोप वे तुन प्रवास दिला जावा असे ही करारानुसार ठरले होते. मात्र सध्याच्या स्थितीत रायगड रोप वे चे तिकीट दर दर वर्षी मनमानी पद्धतीने वाढवण्याचे कसब रायगड रोपवे कंपनी करत आहे तसेच किल्ले रायगडावर महाराष्ट्रा सह शेजारील गुजराथ , कर्नाटक , गोवा या राज्या मधून देखील शैक्षणिक सहली ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत येत असतात यातील बहुतांश शाळा ग्रामीण दुर्गम खेडोपाड्या तीळ शासकीय प्राथमिक शाळा , निवासी शाळा , आश्रम शाळा आशा शाळेंचे विद्यार्थी किल्ला पाहण्या साठी मोठ्या उत्साह ने येत असतात यातील बहुतांश शाळे चे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असतात आशा वेळी या विद्यार्थ्यांना किल्ल्यावर पाई जाण्या शिवाय पर्याय नसतो खेडो पड्या तीळ गोर गरीब जनता देखील कष्टकरी पैशा अभावी शाररिक त्रास ओढत किल्ला सर करतात .
ज्या उद्देशाने रायगड रोप वे बांधला गेला होता मात्र त्या उद्देशाला रायगड रोप वे प्राधिकरण  फाट्या वर मारत आपली मनमानी चालवत आहे .शासकीय अधिकारी , मंत्री यांना रायगडावर रोप वे ची सेवा फुकट आणि विना विलंब मिळत असल्याने यांचे या वाढत्या दरा कडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या सुरु असलेल्या रायगड संवर्धन प्रकल्पात शासकीय रोप वे चा समावेश करण्यात आला आहे. याकरिता सर्व्हेक्षण देखील झाले आहे  टकमक टोकाच्या पायथ्याशी मुबलक जागा उपलब्ध आहे. याठिकाणी नवीन रोप वे ची मागणी शिवभक्त आणि किल्ले रायगड परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे भोसले यांना रायगड हितवर्धक समिती आणि रायगड परिसर विकास समिती कडून एक निवेदन देखील देण्यात आले होते. रायगड वाडी गावात मुबलक जागा आणि पाणी उपलब्ध असून परिसराचा विकास आणि होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवीन शासकीय रोप वे रायगडवाडीतच करण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात अली होती.
जागेचा अभाव आणि यापूर्वी जमिनीला गेलेल्या भेगा
हिरकणीवाडी याठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या रोप वे ची क्षमता कमी असल्याने याठिकाणी कायम गर्दी होत असते. शिवाय विशेष कार्यक्रम असेल तर सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर जाणे देखील शक्य होत नाही. शिवाय रोप वे कडे जाणारा मार्ग हा देखील अरुंद असल्याने याठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते. हा रोप वे सध्या खाजगी कंपनीकडे असल्याने रोप वे चा देखभाल दुरुस्ती खर्च पाहता आज रोप वेचे तिकीट परवडणे कंपनीला शक्य होत नाही असे रोप वे चालवणाऱ्या कंपनी कडून सांगितले जाते मात्र भारतातील अस्तित्वात असलेल्या रोप वे च्या तिकीट दरा पेक्षा रायगड रोप वे चे तिकीट दर हे सर्वाधिक असल्याचे शिवभक्तांकडून सांगितले जाते. 
 ज्या ठिकाणी हा रोप वे उभा आहे त्या परिसरात ऐन पावसाळ्यात जमिनीला भेगा पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रोप वेचा खालील भाग हा मातीचा आणि उताराचा असल्याने या ठिकाणी नवीन रोप वे किंवा रोप वे चा विस्तार होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.या ठिकाणी दर वर्षी पावसाचे प्रमाण भरपूर असल्याने सातत्याने रस्ता खचने घरांना भेगा पडणे दर्डी कोसळणे आशा घटना होत असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे .
रायगड रोप वे चालू झाल्या पासून वरती जाणाऱ्या दोन ट्राल्या आणि खाली येणाऱ्या दोन ट्रल्या आशा चार ट्राल्या सुरू आहेत . मात्र सुरवाती पासूनच याची क्षमता एवढीच होती अचानक जुन्या रोप मध्ये किंवा येथील बसवण्यात आलेल्या यंत्रणे मध्ये बदल नकरता या ठिकाणी पुन्हा दोन ट्रल्या या मध्ये वाढवण्यात आल्या चार च्या ठिकाणी सहा करण्यात आल्या  मात्र या ठिकाणी असलेल्या रोप वे ची  क्षमता किती याचा अध्यप उलघडा झाले ला नाही त्या मुळे या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या ट्राल्या या अनधिकृतच असल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत.
सध्या रायगड रोप वे चे असलेले अवास्तव दर पाहता हे दर नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा अधिकारी कार्यालय यांची कमिटी आवश्यक आहे तरच रायगडावर जाण्यासाठी रोप वे मधून सर्व सामान्य जनतेला परवडू शकेल .
रायगड किल्ला पाहण्या साठी दर दिवस हजारो पर्यटक येत असतात तर तेवढेच रोप वे मार्गाने वर 
जात असतात परंतु अनेक वर्षा पासून ज्या विभागात रोप वे आहे तो भाग दर वर्षी पावसाळ्यात सातत्याने  खचत आहे खचणाऱ्या भागाकडे रोप वे च्या आहारी गेलेल्या प्रशासनाने या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे त्या मुळे सध्याच्या प्रस्थितीत रोप वे चा प्रवास धोक्यात आलेला आहे .त्या मुळे तात्काळ भूगर्भ शासतज्ञान कडून या विभागाची पाहणी होणे गरजेचे आहे.
आजच्या घडीला पाहिले तर रायगड रोप वे कडून होणाऱ्या वाढीव दरा मुले अक्षरशा शिव भक्तांची लूट होत आहे .तरी या होणाऱ्या लूट वर आला देखील बसने गरजेचे आहे .शिव भक्तांची होणारी लूट थांबवण्या साठी शासनाने या रोप वे चे दर निश्चित करणे गरजेचे आहे जेणे कडून किल्यावर जाण्या साठी सर्व सामान्यांना तो दर पडवरू शकेल.
      रायगड किल्ल्यावरील रोप वे चे सध्याचे दर शिव भक्तांना आणि सर्व सामान्यांना न पडवरण्या सारखे आहेत. त्या मुळे अनेक शिव भक्तांना पायी गड सर करावा लागत आहे .शासनाने या विषया कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.शासनाने  एक दर निश्चित करून घ्यावा जेणे कडून तो सर्व सामान्यांना आणि शिव भक्तांना पडवरू शकेल. सिद्देश पाटेकर -शिव भक्त .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा