Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

उजनीतुन कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ..... दोन दिवसानंतर भीमा सीना बोगद्यातून पाणी सोडणार.... दोन फेब्रुवारीपासून दहिगाव तर एक मार्चपासून सीना - माढा सिंचन योजना चालू होणार... धीरज साळे अधीक्षक अभियंता


उजनीतुन कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ.....

 दोन दिवसानंतर भीमा सीना बोगद्यातून पाणी सोडणार....




 दोन फेब्रुवारीपासून दहिगाव तर एक मार्चपासून सीना - माढा सिंचन योजना चालू होणार... धीरज साळे  अधीक्षक अभियंता


 बेंबळे।प्रतिनिधी                    

              उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यात पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला असून सुरुवातीला आज 200 क्यूसेक्स पाणी कालव्यात सोडण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक चार ते पाच तासाला वाढ होणार असून  30 जानेवारी पर्यंत पूर्ण क्षमतेने म्हणजेच 2800ते 3000 क्युसेक्स पाणी कालव्यातून सोडले जाणार आहे. रब्बी हंगामाचे हे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग सोलापूर धीरज साळे यांनी दिलेली आहे.
           सविस्तर वृत्तांत असा की मागील 42 वर्षात  नव्हती एवढी चांगली पाणी साठ्याची अवस्था सध्या उजनी धरणांमध्ये  टिकून आहे.   धरणात 15 ऑक्टोबर 21 रोजी 123. 28 टीएमसी पाणीसाठा होता व आता जानेवारी 22 अखेरीस 121.07 टीएमसी पाणी उपलब्ध आहे ,ही पाण्याची टक्केवारी 107% टक्के आहे .उजनी धरणाची एवढी अनुकूल  परिस्थिती मागील 42 वर्षात कधीही नव्हती.   मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उजनी 111.17 टक्के पूर्ण भरले होते तसेच खरीप हंगामात पाण्याची गरज भासली नव्हती तर नोव्हेंबर अखेरीस सर्वत्र अवकाळी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत चार टीएमसी ने वाढ झालेली होती. त्यामुळे सध्या जानेवारीअखेर, आजपर्यंत कधीही धरणात नव्हता एवढा  मुबलक पाण्याचा साठा शिल्लक आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जानेवारी पासून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला आहे, हे पाणी मुख्य कालवा 20 किलोमीटर ,उजवा कालवा 122 किलोमीटर व डावा कालवा 126 किलोमीटर पर्यंत पोहोचणार असून या सर्व एकुण पाणलोट क्षेत्रातील किमान सहा लाख एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.
    ... चौकट...
 भीमा सीना जोड कालवा( बोगदा )मध्ये काही कंस्ट्रक्शन ची कामे चालू आहेत तसेच  शेतीचे पाइप बसवणे- काढणे ही पण कामे चालू आहेत. आगामी एक ते दोन दिवसात ही कामे संपतील व त्यानंतर उजनीतून बोगद्यात, पर्यायाने सिनानदीत निश्चित पाणी पोहोचेल.
                            त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारी पासून दहिगाव उपसा सिंचन योजना तर एक मार्चपासून सीना माढा सिंचन योजनेच्या आवर्तनास  सुरुवात होईल. यावर्षी उजनी धरणामध्ये सध्या  उच्चांकी पाणीसाठा असल्यामुळे उन्हाळी हंगामात पिण्यासाठी, शेतीसाठी,व उद्योगधंद्यासाठी पाणी कमी पडणार नाही हे निश्चित.
                            धीरज साळे 
                     अधीक्षक अभियंता, सोलापूर

चौकट......
 28 जानेवारी, शुक्रवार ,उजनी ची स्थिती....
 
.......पाणी पातळी 497.150 मीटर
...... एकूण साठा 3428.80 दशलक्ष घन मीटर
......                     121.07 टीएमसी
...... उपयुक्त साठा 1625.99 दशलक्ष घन मीटर
...                           57.41 टीएमसी 
.....         टक्केवारी 107.17%

     विसर्ग
 कालवा.......
 सायंकाळी पाच वाजता 200 क्यूसेक्स,
 रात्री 12 पर्यंत 1000 क्यूसेक्स ....
30 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत 2800 ते 3000 क्युसेक्स.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा