Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

भव्यदिव्य व आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा*---------------------------------------------**स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिक यांचा यथोचित सन्मान करून देवसिंगा नळ ग्रामस्थांनी आधुनिक पायंडा पाडला**----------------------------------------------**६०पेक्षा अधीक देशप्रेमी बहादरांचे रक्तदान**--------------------------------------------



**भव्यदिव्य व आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा*

---------------------------------------------
**स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिक यांचा यथोचित सन्मान करून देवसिंगा नळ ग्रामस्थांनी आधुनिक पायंडा पाडला**
----------------------------------------------
**६०पेक्षा अधीक देशप्रेमी बहादरांचे रक्तदान**
--------------------------------------------

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे उस्मानाबाद.



 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ ग्रामस्थांनी यापूर्वी कुठल्याही गावाने आयोजित न केलेला कार्यक्रम आयोजित करून उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन पायंडा पाडला आहे.
   प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवसिंगा नळ येथील स्वातंत्र्य सैनिक मा.सरपंच आप्पासाहेब पाटील व परीसरातील २५ पेक्षा अधिक  स्वातंत्र्य सैनिक व ७५ पेक्षा अधिक नव्वदीपार  ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून मा.मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ , पुष्पहार , प्रशस्तीपत्र व घड्याळ देऊन करण्यात आला गेल्या तीन  ते चार दशकापासून मी तालुक्यात , जिल्ह्यात व महाराष्ट्रातील कुठल्याही गावात आशा प्रकारचा कार्यक्रम पाहिला नसून  यापुढील पिढीला स्वातंत्र्य सैनिकांचा सहवास लाभणार नसून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल व मला बोलवून माझ्या हस्ते सन्मान केल्याबद्दल मा.मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विशेष आभार मानून ही संकल्पना एवढ्या लहानशा गावाने राबवल्याबद्दल कौतुक केले यावेळी बऱ्याचशा मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून या सीमावर्ती लहानशा गावचे विशेष कौतुक करून असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावेत व यांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे आव्हानही केले,
     यावेळी देशप्रेमी ६० पेक्षा  अधिक बहादरांनी रक्तदान केले रक्तसंकलनासाठी मेडिकेयर ब्लड बँक सोलापूर यांच्या संपूर्ण स्टाफने परिश्रम घेतले
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती दीपक आलूरे तर  प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे , वसंत वडगावे , कल्याणराव पाटील , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे , मा. भीमाशंकर जमादार , अंदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे , मुस्तीचे सरपंच नागराज पाटील , सराटीचे  पिंटू मुळे , इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार चांदसाहेब शेख , शिवसेना युवा नेते विरेश डोंगरे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक इब्राहिम शेख यांनी तर सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. सरपंच भगवंत पाटील , युवराज पाटील , मल्लिनाथ बिराजदार , धनराज पाटील ,  मा. उपसरपंच हज्जू शेख , आशपक शेख , उस्मान शेख , मल्लिकार्जुन बिराजदार ,  शिराज शेख , तुळशीराम घोडके , लोभा राठोड , सतीश राठोड , अझर शेख  , महेबूब शेख यांच्यासह  देवसिंगा नळ ग्रामस्थ व भीमाशंकर पाटील प्रतिष्ठानच्या युवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा