रणसिंगवाडी शेतकऱ्यांसाठी जिहे-कठापूरचे पाणी आणणार - आ. शशिकांत शिंदे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव तालुक्यातील रणसिंगवाडी व वेटणे गावातून जिहे कटापुर योजनेच्या अंतर्गत आंधळी बोगदा गेला आहे. या दोन्ही गावांना या योजनेचे सर्व्हे करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १६ लाख रुपये मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. या गावाने कायम राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली आहे. रणसिंगवाडी बुध मुख्य रस्ता डांबरीकरण ४२ लाख, साकव पूल ३० लाख, अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख यासह विविध विकास कामाचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे. रणसिंगवाडी येथिल विविध विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी आ शशिकांत शिंदे बोलत होते.या प्रसंगी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, बाळासाहेब इंगळे, सागर साळुंखे, राजेंद्र कचरे, जोतिनाना सावंत, संतोष साळुंखे, तुकाराम यादव, युवराज बिटले, ज्ञानेश्वर जगताप, सरपंच सुखदेव रणसिंग, उपसरपंच विठ्ठल मसुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच सुखदेव रणसिंग यांनी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चांगले काम करत आहे गावच्या विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत गावाला जिहे कटापूर योजनेचे पाणी मिळावे व या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले यावेळी श्रीरंग फडतरे, विठ्ठल फडतरे, उमेश फडतरे, बाजीराव जाधव, हणमंत जाधव, जगन्नाथ शिर्के, सुनिल फडतरे, लक्ष्मण जाधव, आप्पासाहेब मसुगडे, सुरेश मसुगडे, नाना मसुगडे, सदाशिव मसुगडे, विश्वास शिंदे हणमंत शिंदे, राजेंद्र क्षीरसागर चंद्रकांत पालकर, अशोक निकम शिवाजी ढमाळ, सुनिल पोतेकर अशोक क्षीरसागर, शंकर रणसिंग शिवदास रणसिंग, निशांत फडतरे, हणमंत जाधव, जगन जाधव, अशोक निंबाळकर, बाळासाहेब नलवडे, कुंडलिक मसुगडे, बापुराव पोतेकर, सुनिल रणसिंग आदिसह ग्रामस्थ व पदाधिकारी विविध मंडळाचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती तर उपसरपंच विठ्ठल मसुगडे यांनी स्वागत केले बापूराव बागल यांनी सूत्रसंचालन, सुभाष शिंदे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा