Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

अशासकीय समितीवर बंजारा समाजातील व्यक्तीची निवड प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा*


*अशासकीय समितीवर बंजारा समाजातील व्यक्तीची निवड प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

      उस्मानाबाद :- वसंतराव नाईक तांडा वस्ती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी बंजारा समाजातील व्यक्तीची निवड केल्याशिवाय जिल्हास्तरीय नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात येऊ नये अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली होती मात्र प्रशासनाने ही नियुक्ती न केल्याने याप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन करण्यात आला आहे.
     उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांना आज दिनांक 23 फेब्रुवारी  रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की,अशासकीय समितीच्या अध्यक्षपदावर बंजारा समाजातील एका व्यक्तीची निवड करावी अशी मागणी संघटना आणि समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. मात्र ही निवड अद्याप पर्यंत झालेली नाही. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीस सहाय्य करण्यासाठी अशासकीय समितीची स्थापना केली आहे. या समितीवर तालुका लोकप्रतिनिधी ची नियुक्ती केल्यामुळे यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेमुळे तांडा वस्तीचा समतोल विकासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, तांडा वस्ती विकासाला खीळ बसू शकते,तांडा वस्ती विकासामध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवू शकतो. असा संदर्भ जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आले आहे.
   याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील या अशासकीय समितीवर बंजारा समाजातील एका व्यक्तीची अध्यक्षपदी निवड करण्याची गरज आहे ही निवड होईपर्यंत जिल्हास्तरीय नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात येऊ नये अन्यथा संघटनेच्यावतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 21 मार्च 2022 पर्यंत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यास औरंगाबाद येथील खंडपीठात जनहित दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे.
     या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, कार्यकारी संचालिका सुशिलाबाई चव्हाण,रेणुका राठोड,युवा संघटक दीपक राठोड,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष वसंत पवार, उमरगा तालुका अध्यक्ष प्रताप राठोड आणि युवा संघटक पिंटू राठोड  स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा