यात्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांना त्रास देऊ नका : बाप्पू माने
श्रीगोंदा-नितीन रोही
शहरात दोन वर्षांनंतर शेख महंमद महाराज यांची यात्रा भरत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी छोटे व्यावसायिक येथे आले आहेत. या व्यवसायिकांना कोणी त्रास देऊ नये, असे आवाहन प्रहारचे शहराध्यक्ष बापू माने यांनी केले. माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, करोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे यात्रा भरली नाही. यात्रा जत्रांवर पोट असणारा मोठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे. यावर्षी यात्रा भरेल का नाही अशी संशयाची परिस्थिती होती. मात्र, आपण पुढाकार घेऊन आनंद मेळाचे आयोजन केले आहे. छोट्या व्यावसायिकांना यापूर्वीचा आलेला अनुभव पाहता त्यांना संरक्षण देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा