*ऊसतोड कामगारांच्या नोंदणी शासन स्तरावर तात्काळ होणे बाबत तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक 7 मार्च 2022, रोजी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या शासन स्तरावर नोंदणी तात्काळ होणे बाबत,या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील साखर उद्योगास भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो या उद्योगात काबाडकष्ट करून हलाखीचे जीवन जगणार्या प्रत्येक भारतीयांच्या तोंडात गोडवा निर्माण करणाऱ्या ऊसतोड कामगारांचा सिंहाचा वाटा असून अद्याप यांना न्याय मिळाला नाही सदरील कामगारांची शासन स्तरावरून नोंदणी नसल्या कारणाने विविध कल्याणकारी योजनेपासून आजही वंचित आहेत. तरी ऊसतोड कामगारांची नोंदणी शासन स्तरावर लवकरात लवकर करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, उमरगा तालुका अध्यक्ष प्रताप राठोड संतोष हिरामण,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा