*वीज वितरण कंपनीस संजय पाटील-भिमानगरकर यांचे अल्टीमेटम ; ०५ मार्च पर्यंत वीज सुरळीत करा अन्यथा हलगी मोर्चा*
*"टेंभुर्णी वीज वितरण कार्यालयास टाळे ही ठोकले."*
टेंभुर्णी : - पूर्ण क्षमतेने वीज सुरळीत सुरू करावी,माढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची थ्रीफेज वीज कनेक्शन पूर्ववत चालू करावीत,शेतकऱ्यांची चालू बिले महावितरण कंपनीने एचपी प्रमाणे दुरुस्ती करून द्यावीत अशी मागणी जि.प.चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील-भिमानगरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
विजवीतरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,सध्या उन्हाळा अतिशय कडक सुरू आहे.यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.महावितरण कंपनीने ३ एच.पी.ला पाच एच.पी व पाच एच.पी.ला ७.५० एच.पी.तसेच ७.५० एच.पी.ला १० एच.पी.प्रमाणे बिले आकारलेली आहेत.ही बिले एच.पी.प्रमाणे आकारण्यात यावीत.गेल्याच महिन्यात शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये भरलेले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वीज सुरळीत करून सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी.जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ०५ मार्च वीज कार्यालयासमोर हलगी मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संजय पाटील-भिमानगरकर यांनी दिला आहे.याची सर्व जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील असे ही शेवटी निवेदनात म्हटले आहे.
या वेळी टेंभुर्णी,चव्हाणवाडी,मिटकलवाडी,भिमानगर,वेणेगाव,माळेगांव,बेंबळे,टाकळी,आढेगाव,चांदज,आलेगाव,शिराळा,रांजणी, व कोंढार भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा