Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मंथन गरजेचे**प्राचार्य डॉ मणेर यांचे प्रतिपादन*



*समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मंथन गरजेचे*
*प्राचार्य डॉ मणेर यांचे प्रतिपादन*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर,दि.१४, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले,सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ मणेर म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक असामान्य असे व्यक्तित्व होते, त्यांना आपल्या जिवनात समाजातील अनेक वाईट व अवमानवीय चालिरितिंना सामोरे जावे लागले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नाही ही बाब त्यांना अस्वस्थ करत होती, म्हणुनच ४ मार्च १९२७ ला महाड येथील चवदार तळ्याच्या सत्यागृह केला,२५ डिसेंबर १९२७ मध्ये मनुस्मृती दहन करण्यात आले,२५ मार्च १९३० काळाराम मंदिर आंदोलन करण्यात आले, भारतातील अठरा पगड जाती या अवमानवीय जाचक बंधनाखाली जखडला गेल्या होत्या, त्यांनी समाजाला गुलामगिरीची जाणीव करून दिली त्यामुळे सर्वसामान्य दलित वर्ग बहुजन समाज जागृत झाला, विश्वाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासानंतर  भारतीय राज्यघटनेची निर्मिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, आणि आज आपणांस लोकशाही व्यवस्थेमुळे पददलित समाजाला,लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले, भारतीय राज्यघटनेमुळेच आज जातिभेद,वर्णभेद संपुष्टात आले,या असामान्य अशा महामानवाच्या विचारांचा आदर्श आज समाजाने अंगिकारणे समाज हितासाठी आवश्यक असल्याचा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण यांनी पुढाकार घेतला तर कार्यक्रमाप्रसंगी प्रोफेसर डॉ मेजर वाय ए डोके,प्रा.धनंजय लोंढे,प्रा.डॉ.नेताजी काळे, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे, ग्रंथपाल दिपक निकाळजे,प्रा.आशपाक आतार  यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ बी डब्ल्यू गुंड यांनी तर आभार स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.एम.आर आडे यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा