*जनतेला भारनियमनाच्या काळोखात लोटणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपचे कंदिल आंदोलन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात आज २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव येथील महावितरण कार्यालयासमोर कंदिल आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि भाजपचे धाराशिव जिल्ह्यातील आ.राणाजगजीतसिंह पाटील आणि आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर म्हणाले, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने भारनियमन चालू केले आहे. कोळशाचा तुटवडा असल्याचे खोटे कारण देऊन वीज निर्मिती कमी झाल्याचे सरकार सांगत आहे. वास्तविक केंद्राकडे मागणी करून त्यांनी विजेचे उत्पादन वाढवले पाहिजे. परंतु महाविकास आघाडी सरकारने कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भारनियमनाचे चटके सोसावे लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र बंद असल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उद्योगांची सुद्धा अशीच अवस्था आहे. तसेच अव्वाच्या सव्वा वीजबिले माथी मारली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याकडे महावसुली सरकारचे दुर्लक्ष दिसत आहे. सरकारचे भारनियमनाच्या गंभीर लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही प्रतीकात्मक कंदील आंदोलन केले आहे, हे ठाकरे सरकार उजेडात व सामान्य जनता ,शेतकरी काळोखात अशी अवस्था झाली आहे ,हे राज्यकर्ते भ्रष्टाचाराने बरबटले आहेत कसल्याही प्रकारचा त्यांच्यावर अंकुश नाही नियोजन नाही ,तरी या ठाकरे सरकारला लवकर जाग न आल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या काळात यापेक्षा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.
या आंदोलना वेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, विनोद गपाट, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे , जिल्हासचिव संदीप कोकाटे, शहराध्यक्ष राहुल काकडे, माजी नगरसेवक प्रवीण पाठक, सरचिटणीस,बालाजी कोरे, उपाध्यक्ष शेषेराव उंबरे, सरचिटणीस विनोद निंबाळकर ,शहराध्यक्ष सुजित साळुंके , तालुकाअध्यक्ष ओम नाईकवाडी, गिरीश पानसरे ,वैभव हंचाटे सचिन लोंढे ,दाजीआप्पा पवार , रोहीत देशमुख,हिम्मत भोसले, सुनिल पंगुडवाले ,मेसा जानराव, सार्थक पाटील ,सागर दंडनाईक ,आदित्य इंगळे, इत्यादी भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वसामान्य जनतेला भारनियमनाचे चटके सोसावे लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र बंद असल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उद्योगांची सुद्धा अशीच अवस्था आहे. तसेच अव्वाच्या सव्वा वीजबिले माथी मारली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याकडे महावसुली सरकारचे दुर्लक्ष दिसत आहे. सरकारचे भारनियमनाच्या गंभीर लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही प्रतीकात्मक कंदील आंदोलन केले आहे, हे ठाकरे सरकार उजेडात व सामान्य जनता ,शेतकरी काळोखात अशी अवस्था झाली आहे ,हे राज्यकर्ते भ्रष्टाचाराने बरबटले आहेत कसल्याही प्रकारचे अंकुश नाही नियोजन नाही ,तरीही या ठाकरे सरकारला लवकर जाग न आल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या काळात यापेक्षा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.
या आंदोलना वेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, विनोद गपाट, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे , जिल्हासचिव संदीप कोकाटे, शहराध्यक्ष राहुल काकडे, माजी नगरसेवक प्रवीण पाठक, सरचिटणीस,बालाजी कोरे, उपाध्यक्ष शेषेराव उंबरे, सरचिटणीस विनोद निंबाळकर ,शहराध्यक्ष सुजित साळुंके , तालुकाअध्यक्ष ओम नाईकवाडी, गिरीश पानसरे ,वैभव हंचाटे सचिन लोंढे ,दाजीआप्पा पवार , रोहीत देशमुख,हिम्मत भोसले, सुनिल पंगुडवाले ,मेसा जानराव, सार्थक पाटील ,सागर दंडनाईक ,आदित्य इंगळे, इत्यादी भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा