*तुळजापूर शहरात कडक प्लास्टिक बंदी मोहिम*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर शहरात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात तुळजापूर नगर परिषदने पावले उचलली आहेत. त्यानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅग) उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकवर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगर परिषद ने त्याची कारवाई सुरू केली आहे.
या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) या प्लास्टिक उत्पादन, विक्री व वापरावर बंदी करण्यात आली
या कायद्यांतर्गत नियम तयार करण्यात आले आहेत.
कायद्यातील या नियमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व इतर उत्पादने हे नैसर्गिकदृष्टय़ा व जैविकदृष्टय़ा विघटनशील नसल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून त्याचा जैवविविधतेवरही अनिष्ट परिणाम होत आहे.
*विशेषत*: प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे जलनिस्सारणास अडथळा निर्माण होतो व पाणी तुंबून अनेक आरोग्यविषयक समस्यांचा नागारिकांना सामना करावा लागतो. सागरी जिवांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या उत्पादन, साठवणूक, विक्री, वापर व वितरणावर बंदी घातली आहे. त्यात किरकोळ विक्रीसाठी व अन्य वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक व प्लास्टिक समावेश आहे,
दिनांक १५/०४/२०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपार पर्यंत नगर परिषद च्या पथकाने अंदाजे १२० किलो प्लास्टिक जप्त केले. कार्यवाही मा.प्रशासक योगेश खरमाटे आणि मा.मुख्यधिकारी अरविंद नातु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत वैभव पाठक(कार्यालयीन अधिक्षक),(कर निर्धारक) रणजित कांबळे,(स्वछता निरीक्षक) दत्तात्रय साळूंके,(शहर समन्वयक) सुशांत गायकवाड ,राजाभाऊ सातपुते,व्ही.एस. मोटे,गुणवंत कदम(बिट प्रमुख),लखन कंदले व स्वच्छता विभागातील इतर कर्मचारी यांचा सहभाग होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा