विजयपूर कडे जाणार्या वाहनांची संख्या घटली .
➡️ नव्या हत्तूर बायपास मार्गे वाहने मार्गस्थ .
मोहोळ प्रतिनिधी - गेल्या पंधरा वर्षांपासून मोहोळ मधून विजयपूरकडे जड वाहनांना सोलापूर शहराच्या पश्चिमेकडून जाणार्या नव्या रस्त्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून . दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय दळणवळण मंत्री मा . ना . नितीन गडकरी नव्या बायपास महामार्गाचे लोकार्पण केल्यामुळे सदरची वाहने या नव्या बायपास महामार्गावरून जात आहेत .
त्यामुळे आता सहाजिकच मोहोळ शहरातील नेहमी जड वाहनांनी गजबजलेल्या कुरूल रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे . या मार्गावरील आता तीस टक्के जड वाहनांनची वर्दळ कमी झाली असून सदरची वाहने नव्याने झालेल्या हत्तूर बायपास मार्गे जात आहेत . या जड वाहनांना अत्यंत अद्यावत आणि सुसज्ज रस्ता उपलब्ध त्यांनी मोहोळ कोरवली मार्गाला फाटा दिला आहे . शिवाय वाहनांचा इंधन खर्च आणि वेळ देखील वाचणार आहे मात्र या वाहनांना सावळेश्वर येथील टोळ सुध्दा द्यावा लागणार आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सध्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल २८ हजार कोटींच्या नव्या महामार्गांची बांधणी युध्दपातळीवर सुरू आहे . मात्र मोहोळ - मंद्रुप विजयपूर या महामार्गाला अद्याप निधी मंजूर न झाल्यामुळे हा महामार्ग चौपदरीकरण होणार की नाही ? याबाबत साशंकता आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा