Breaking

शुक्रवार, ६ मे, २०२२

मिटकलवाडी अंजली खून प्रकरणास कलाटणी खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न- पतीस 9 मे पर्यंत पोलीस कोठडी*


*मिटकलवाडी अंजली खून प्रकरणास कलाटणी खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न- पतीस 9 मे पर्यंत पोलीस कोठडी*


: - माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथील अंजली सुरवसे आत्महत्या प्रकरणास कलाटणी मिळाली असून अंजली हिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहिरीत टाकून दिले असल्याचे शवविच्छेदन अहवालावरून  स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व तपासी अंमलदार सपोनि सुशील भोसले यांनी दिली आहे.

अंजली हनुमंत सुरवसे (वय-२४) रा.मिटकलवाडी ता.माढा असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.अंजली हिचा दि ०१ मे रोजी रात्री ०२ वा.शेतातील विहिरीत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंजली हिच्या माहेर कडील लोकांनी तिचा पती हनुमंत गोवर्धन सुरवसे,सासू अन्नपूर्णा गोवर्धन सुरवसे,दिर वैभव गोवर्धन सुरवसे,नणंद राणू विठ्ठल मुळे,तिचा नवरा विठ्ठल नामदेव मुळे दोघे रा.उंबरे पागे, ता.पंढरपूर,दुसरी नणंद अंजली बाळासाहेब थिटे रा.उंबरे (वेळापूर) ता.माळशिरस यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला होता.याची फिर्याद अजय नामदेव कदम (वय-२३) रा.उंबरे पागे ता.पंढरपूर याने दिली होती.

मृत अंजली हिचा शवविच्छेदन अहवाल नुकताच पोलिसांना मिळाला आहे.यामध्ये अंजली हिचा मृत्यू पाण्यात बुडुन झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच तिचे दोन्ही हाताचे हाड खुब्यातून मोडले असून एका बाजूचे गळ्याजवळील बरगडीचे हाड ही मोडले असल्याची माहिती सपोनि सुशील भोसले यांनी दिली आहे.तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.यामुळे मृत अंजली हिचा मृत्यू अत्यंत क्रूरपणे झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अंजली सुरवसे हिचा मृतदेह विहिरीतील पाण्यात मिळून आल्यानंतर सर्व आरोपीवर खूनाचे कलम लावावे अशी मागणी माहेरच्या नातेवाईकांनी लावून धरली होती.अंजली हिच्या मृत्यूमुळे नातेवाईक व परिसरातील नागरिक प्रक्षुब्ध झाले होते.या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण परिसरातून उमटले होते.या रागातूनच अंजली हिच्या पार्थिवावर तिच्या सासरच्या दारात अंत्यविधी करून रोष उघड करण्यात आला होता.यावेळी नातेवाईक महिलांनी मोठा आक्रोश केला होता.यावेळी सासरकडील सर्वजण पसार झाले होते.यावेळी काही अनुचित घटना घडू नये यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.यावेळी माहेरच्या लोकांनी सासर कडील लोकांनी केलेल्या जाचहाट व छळामुळेच अंजली हिचा मृत्यू झाला असून त्या सर्वांनी अंजली हीच खून केलेला आहे.यामुळे या सर्वांवर खुनाचे कलम लावून तपास करावा अशी मागणी लावून धरली होती.मात्र पोलिसांनी सावध भूमिका घेत शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर बघू अशी भूमिका घेतली होती.


रोजी लग्नात चांगला मानपान केला नाही. लग्नात चांगला रुखवत दिला नाही व हुंडा कमी दिलेला आहे.ऊस तोडीचे ट्रॅक्टर टोळी साठी माहेरच्या लोकाकडून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून अंजली हीचा छळ करण्यात येत होता.यातूनच तिचा मृत्यू झालेला असून तिच्या मृत्यूस वरील हे सर्वजण कारणीभूत आहेत असे म्हटले आहे.
पोलिसांनी आता भादवी कलम ३०२,३०४ ब,२०१,१२० ब,३४,४९८ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या प्राकरणी मृत अंजलीचा पती हनुमंत सुरवसे यास पोलिसांनी ०१ मे रोजीच ताब्यात घेतले होते.त्यास प्रथम ५ मे पर्यंत व नंतर ०९ मे पर्यंत पोलीस कोडठीत आहे.तर उर्वरित सर्व आरोपी फरार झाले आहेत.पोलिस त्यांचा तपास करीत आहेत.

*AJ 24 Taas News साठी बेंबळे, प्रतिनिधी सज्जन शिंदे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा