“ विशेष अमृत जनलाभ " मोहिम 2022 चे आयोजन..तहसीलदार कुलथे
श्रीगोंदा:नितीन रोही
सविस्तर असे की जिल्हा व सत्र न्यायाधिश, (तालुका विधी सेवा समिती, श्रीगोदा) आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवठा विभागातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत नवीन इष्टांक निवड करणे व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी निवड करणे याबाबत “विशेष अमृत जनलाभ मोहिम " 2022 आयोजित करण्यात आलेली आहे. तरी तलाठी/ ग्रामसेवक/ स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून दिनांक 23 मे 2022 ते 26 मे 2022 या कालावधीत सदरचे कामकाज मंडलनिहाय करावयाचे आहे. सदर बाबतीत तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या बैठका घेतल्या आहेत.
त्यानुसार खालील मंडलनिहाय कामकाजाचे नियोजन करणेत आलेले आहे. नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविणेत आलेले कामकाज पुर्ण करावयाचे आहे. याबाबत श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी प्रसिद्धी पत्र काढले आहे.
दिनांक 23 मे 2022 रोजी श्रीगोंदा व काष्टी, 24 मे रोजी देवदैठण, चिंभळा, दिनांक 25 मे रोजी कोळगाव, मांडवगण तर दिनांक 26 मे 2022 रोजी पेडगाव, बेलवंडी बु. या गावात सकाळी 9:00 ते 12:00 व दुसऱ्या मंडळात दुपारी 4:00 ते सायंकाळी 7:00 पर्यंत वरील प्रमाणे तालुका विधी सेवा समिती व तहसील कार्यालय व पंचायत समिती श्रीगोंदा यांचेमार्फत अन्नधान्याचे इष्टांक निवड व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थी यांची निवड करण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांना पात्र लाभार्थी यांनीच त्या - त्या मंडळाचे ठिकाणी उपस्थित राहून, आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज करावेत असे आवाहन तहसीलदार कुलथे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा