मोफत गहू- तांदूळ व अंत्योदय योजनेतील रेशन वाटपाबाबत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय ....
......तातडीने कार्यवाही व्हावी ...
आमदार बबनदादा शिंदे यांची राज्य शासनाकडे मागणी
बेंबळे।प्रतीनीधी। फोटो.. आ.बबनदादा
पंतप्रधान गरीब कल्याण योजना व मोफत अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जनतेला मिळणारे गहू तांदूळ माहे एप्रिल मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे परंतु सोलापूर जिल्हातील जनतेला मात्र एप्रिल महिना संपला तरी हे अन्नधान्य मिळाले नाही याबद्दल तातडीने कार्यवाही व्हावी व जिल्ह्यातील जनतेला रीतसर धान्य मिळावे अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , पुरवठा मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
मेलद्वारे पाठवलेल्या पत्रात आमदार बबन दादा शिंदे म्हणतात की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत जिल्ह्यातील संबंधित शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्यात वेळेवर गहू-तांदूळ अन्नधान्याचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप केले जाते, परंतु माहे एप्रिल महिन्याचे ग्राहकांचे अन्नधान्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वाटप करण्यात आले व फक्त सोलापूर जिल्हा या पासून वंचित राहिला आहे त्यामुळे संबंधित शिधापत्रिकाधारकातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. संबंधित मंत्री महोदय व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतीत तातडीने लक्ष घालून राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी गहू तांदूळ वाटपाचे तातडीने युद्धपातळीवर नियोजन करावे असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा