Breaking

गुरुवार, ९ जून, २०२२

*लक्ष्मी-आनंदचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम* *लक्ष्मी-आनंद कॉलेजच्या 100 % निकालाची परंपरा अबाधित..!!*



*लक्ष्मी-आनंदचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम* 
 *लक्ष्मी-आनंद कॉलेजच्या 100 % निकालाची परंपरा अबाधित..!!* 


     भिमानगर प्रतिनिधी धनंजय भोसले   

**********************


बारावी बोर्ड चे नुकताच निकाल जाहीर झाले त्यामध्ये लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. क्रॉप सायन्सला 200 पैकी 200 गुण मिळवून मयुरी सिद्धेश्वर मुटकुळे, अकाउंट मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून दीक्षा खंडू मुसळे आणि क्रॉप प्रोडक्शन मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून अद्वितीया शंकर बिस्वास यांनी महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

       लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज मधील क्रॉप सायन्स मध्ये 41 विद्यार्थी 190 च्या पुढे, भूगोल मध्ये 10 विद्यार्थी 90 च्या पुढे तसेच गणित मध्ये 12 विद्यार्थी 90 च्या पुढे आहेत तसेच 65 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले आहे.
      लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व  ज्यु.कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मयुरी सिद्धेश्वर मुटकुळे(92.67 %), द्वितीय क्रमांक प्रथमेश चारुदत्त पवार(91.83 %) आणि तृतीय क्रमांक ऋतुराज राजकुमार रहीगुडे(91.00 %)यांनी मिळवला आहे. कॉलेज मधील सायन्सचा निकाल 100 % तसेच कॉमर्स चा देखील निकाल 100 % लागला आहे.नेहमीप्रमाणेच याही वर्षी संस्थेचा निकाल 100% लावण्याची परंपरा अबाधित राहिली आहे.
      सर्व यशस्वीतांचे संस्थेचे चेअरमन माननीय योगेशजी बोबडे,सेक्रेटरी सुरजा बोबडे, कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत राऊत, उपप्राचार्य सौ.सोनल शेवतेकर मॅडम, कॉलेज विभागाचे प्रमुख प्रमोद ननवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा