भुरकवडीच्या तुळजाभवानी देवीची यात्रा दिमाख्यात साजरी
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गेल्या ३५ वर्षीच्या कारकिर्दीतील भुरकवडी ता खटाव येथील श्री तुळजाभवानी देवीची यात्रा या वर्षी मोठ्या दिमाख्यात साजरी करण्यात आली. १९८७ ला देवस्थानची स्थापना झाल्यापासून एक दिवसीय असणारी यात्रा या वर्षी तीन दिवसातील विविध कार्यक्रमाने पार पडली. शनिवार दि २८ रोजी तुळजाभवानी मंदिरात पहाटे देवीचे स्नान, पूजाआरती, अभिषेक, महापूजा घालण्यात आली. दुपारी ४ वाजता नैवैदय दाखविण्यात आला. भुरकवडीचे जावई रामचंद्र यशवंत फडतरे वाकेश्वर व विक्रम अमृत जाधव चिमणगाव यांच्या वतीने संध्याकाळी ५ ते ८ महाप्रसाद वाटप झाले. रात्री ८ ते १० मायणी येथील सनई वाद्याच्या सूरात देवीची पालखीतून छबीना मिरवणूक काढण्यात आली. रात्री १० ते १२ पर्यंत भालवडी येथील हनुमान संगीत सोंगी भारूडी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
रविवार दि २९ रोजी संध्याकाळी ९ वाजता गावातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तीचा सन्मान शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तर कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशासेविका, मदतनीस यांचा सत्कार समृध्दी को- ऑप सोसायटी पतसंस्था शाखा विक्रोळी मुंबईचे मार्गदर्शक हिंदूराव कदम व उपध्यक्षा वंदना कदम यांच्या वतीने साडी चोळी देऊन करण्यात आला. नंतर रात्री १० वाजता कोल्हापूर येथील धमाका ऑर्केस्ट्रा दाखविण्यात आला.
सोमवार दि ३० रोजी बैलगाडी शर्यत पार पडली असून यामध्ये २०० बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदविला. शासन नियमानुसार बैलगाडी शर्यत वेळेत पार न पडल्यामुळे फायनलच्या सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना समान बक्षीसे वाटप करण्यात आले. बैलगाडी शर्यतीचे धावते समालोचन शरद कदम, सुनिल मोरे यांनी केले. रात्री ९ वाजता देवीच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला. पोलीस दलात कार्यरत असणारे सातारा भणंग गावचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्या वतीने देवस्थानला ४० हजार रूपये किमतीची पालखी अर्पण करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा