विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर .....
दर्जेदार बेणे, कंपोस्ट खते व जिवाणू खते कारखान्यामार्फत देणार...
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतीनीधी। फोटो
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन 2022- 2023 सालासाठीचे ऊस लागवड धोरण जाहीर झाले असून बेणे वाटप योजनेअंतर्गत ज्यादा शर्करायुक्त दर्जेदार बेणे तसेच जिवाणू खते व कंपोस्ट खते शेतकर्यांना कारखान्यामार्फत मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे. या प्रसंगी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे,जनरल मॅनेजर सुहास यादव ,शेती अधिकारी सुनील बंडगर व ऊस विकास अधिकारी नारायण लगड आदी मान्यवर उपस्थित होते.
सन 2022-2023 करतात आडसाली, पूर्वहंगामी, व सुरू अशी त्रिस्तरीय लागण करण्याचे नियोजन आहे .यामध्ये 15 जून ते 31 ऑगस्टपर्यंत आडसाली ,एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्वहंगामी व 1 डिसेंबर 21 ते 28 फेब्रुवारी 23 पर्यंत सुरू उसाची लागण करण्यात यावी असे कळविण्यात आले आहे . बेणे वाटप योजने
अंतर्गत त्रिस्तरीय योजना राबवण्यात येणार असुन या योजनेअंतर्गत कारखान्याने पाडेगाव संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक या ठिकाणचे मूलभूत बियाणे आणून सभासदांच्या शेतात पायाभूत व प्रमाणित बेणे प्लॉट तयार केले आहेत, या मधून शेतकऱ्यांना दर्जेदार व निरोगी बेणे पुरवण्यात येणार आहे. या ठिकाणी जादा शर्करायुक्त नवीन वाणाचे कोसी 671,को 86032, व्हिएसआय 8005 व एम एस 10001 या जातीचे बेणे उपलब्ध करण्यात आलेले आहे. उसाची लागवड पारंपारिक पद्धतीने न करता दोन सऱ्यांमध्ये पाच फूट अंतर ठेवून सलग सरी पध्दतीने लागण करणे फायद्याचे ठरणार आहे. उसासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांचेकडील मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट व मँक्रोन्यूट्रीएंट जिवाणू खते व तसेच कारखान्यांमध्ये प्रेसमड पासून तयार केलेले उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत पुरवण्यात येणार आहे. उसाच्या लागवडीपूर्वी जमिनीतील माती परीक्षण व पाणी परीक्षण कारखान्यातील प्रयोगशाळेत करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जमिनीचा सामू (पीएच), नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य याचे परीक्षण करून प्रयोगशाळेच्या शिफारशीनुसार संतुलित खताचा वापर करणे व तसेच साखर उतारा व प्रती हेक्टरी उसाचे उत्पादन वाढवण्यास अधिक मदत होणार आहे . उसासाठी ठिबक ( ड्रीप) पद्धतीनेच पाण्याचा वापर करून अनावश्यक पाण्याचा अपव्य टाळण्यात यावा असे आव्हान करण्यात आले आहे. ऊस लागवडीनंतर तीन दिवसाच्या आत शेती गट ऑफिसमध्ये सूचना पत्र भरून देणे बंधनकारक आहे, त्यानंतर लगेच ॲग्रीओव्हरसियर व चीट बॉय यांचेमार्फत पाहणी करून मोबाइल मेसेज द्वारे लागण नोंद करुन शेतकऱ्यांना कळवण्यात येणार आहे. तारखेप्रमाणे कोसी 671, व्हि एस आय 8005, को10001 उसाची तोडणी करण्यात येणार असून जे शेतकरी नियमबाह्य बेण्याची किंवा हंगामावार नियमाचे पालन करणार नाहीत त्यांचा उस एक महिना उशिरा सोडण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे. या हंगामापासून उसाच्या लागण नोंदी मोबाईल मेसेज द्वारे होणार असल्यामुळे शेतकऱ्याकडे पक्की व खात्रीशीर लागण तारीख राहणार आहे ,त्यामुळे पुढील हंगामात ऊस तोडणी प्रोग्रॅम मध्ये कसल्याही प्रकारची व कोणालाही वर - खाली नोंदणीतारीख करता येणार नाही व शेतकऱ्यांची बाजू सुरक्षित राहणार आहे त्यामुळे या उसलागणनोंदीवर शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा