Breaking

बुधवार, ८ जून, २०२२

पुसेगावच्या अतुलची ' अतुलनीय कामगिरी 'एक 'अतुल' निय व्यक्तिमत्त्व, पोलीस मित्र - अतुल जाधव



पुसेगावच्या अतुलची ' अतुलनीय कामगिरी '
एक 'अतुल' निय व्यक्तिमत्त्व, पोलीस मित्र - अतुल जाधव


वडूज प्रतिनिधी /शरद कदम

        प्रत्येकाला आपल्या अवतीभवती अशा काही व्यक्ती  भेटतात ज्या अल्पावधीतच त्यांच्या मनामध्ये आपलं एक वेगळे स्थान निर्माण करतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे खटाव तालुक्यातील सेवागिरी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव सुवर्णनगरीतील अतुलनीय व्यक्तीमत्व व वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब. 
       पोलीस म्हटलं की सामान्य माणसाच्या मनात एक भिती व दडपण आपसूकच निर्माण होते. पण याला अपवाद म्हणजे पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब. सन- २०२० मध्ये वैभववाडी पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांनी स्विकारला. वैभववाडीत दि.२७-०७-२०२० ते दि.३१-०५-२०२२ या आपल्या कारकीर्दीत  अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याच्या ३ दिवसांत अहमदनगर येथे जात त्यांनी मुसक्या आवळल्या. तसेच अवघ्या २४ तासात २३ लाखांच्या लुटीच्या बनावटीचा त्यांनी पर्दाफाश केला तर दरोडेखोरांचा अडीच तास थरारक पाठलाग करत ९ लाखांचा मुद्देमाल त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जप्त केला होता. अशा अनेक गुन्ह्यांचा तपास अगदी शिताफीने व हुशारीने अल्पावधीतच त्यांनी लावला, खरं तर ते त्यांचे कौशल्यच म्हणावे लागेल. यावेळी वैभववाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गाचे देखील मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. वैभववाडी शहरात फिरणाऱ्या निराधार महिलेला संविता आश्रम येथे दाखल करण्यास जाधव साहेब यांचे सहकार्य लाभले होते. याशिवाय कोकीसरे रेल्वे फाटक नजिकच्या तीव्र उताराच्या वळणावर टॅंकर मधुन सांडलेल्या काकवीमुळे अपघात घडून पहाटेच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अशा वेळी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन रस्ता स्वच्छ धुवून त्यांनी वाहतूक सुरळीत केली होती. गेल्या वर्षी तर एडगाव नजिक पहाटे ट्रॅव्हल्स ला लागलेली आग दुसऱ्या दिवशी टेम्पो ट्रॅव्हल्स अपघात तिसऱ्या दिवशी नदित कोसळलेल्या कार चा अपघात अश्या अपघातांच्या मालिकांमध्ये देखील प्रवासी व स्थानिक नागरिकांना तात्काळ मदतीसह धिर देण्याचे काम त्यांनी केले आहे. पावसाळ्यात करूळ व भुईबावडा घाटात सतत दरडी कोसण्याच्या घटना घडत असताना वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ते नेहमीच सतर्क असायचे. पावसाळ्यातील पुर परिस्थिती असो किंवा वादळाने वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागात झालेले नुकसान त्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या सिमेवर करूळ- भुईबावडा येथील व  वैभववाडी तालुक्यातील एकंदरीत सर्व परिस्थिती त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली आहे. कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना जनतेला धिर व मनोधैर्य देण्याचे काम त्यांनी केले आहे. याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना कोव्हिड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे शिवाय अनेक गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे तसेच सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्था,संघटनांनी देखील वेळोवेळी त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे व नेहमीच्या धावपळीच्या कामात थोडा विरंगुळा म्हणून पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब यांनी वैभववाडी पोलीस कर्मचाऱ्यांची एक क्रिकेट टीम तयार केली त्यांच्या या टीमने मैदान देखील गाजवली आहेत. वैभववाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील तसेच जाधव साहेब यांच्या सदैव सोबत असणारे त्यांच्या गाडीचे नेहमीच सारस्थ करणारे मारुती साखरे व अन्य पोलीस कर्मचारी यांचे त्यांना नेहमी सहकार्य लाभले. अगदी वैभववाडी पोलीस ठाण्याचा कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळून वैभववाडी पोलीस ठाण्याच्या निरोप घेत असताना  सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पोलीस कॉन्स्टेबल मारूती साखरे व अजित पडवळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जाधव साहेब यांना शुभेच्छा दिल्या.
             आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक सलोखा जपण्याचे काम त्यांनी केले आहे. वैभववाडी तालुक्यातील गुन्ह्यांचा तपास व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असतानाच प्रामाणिक पोलीस कर्मचारी तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला देखील ते विसरले नाहीत. तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थां, मंडळे यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांना आपला अमूल्य वेळ देऊन ते आवर्जून उपस्थित असत. त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे तालुक्यातील युवा वर्गाकडून एक 'दबंग पोलिस अधिकारी' म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. रंगपंचमीच्या काळात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना वाभवे येथील तरुणांना त्यांच्या समवेत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. लोरे नं- २ येथे १० वर्ष स्वतः च्या मालकीच्या जागेत जाऊ न शकलेल्या मधुकर कांबळे कुटुंबीयांना जाधव साहेबांच्या माध्यमातुन न्याय मिळाला त्याबद्दल कांबळे कुटुंबीयांनी जाधव साहेब व अन्य पोलीस कर्मचारी वर्गाचा फेटा,हार,शाल घालून आरती ओवाळून सत्कार केला. यावेळी अतुल जाधव साहेब यांच्या रूपाने मला साक्षात देवच भेटला असे मत मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले. त्यांचा फोटो आपण फ्रेम करून घरी लावणार असल्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. वैभववाडी तालुक्यातील आम जनतेला  हमखास न्याय मिळवून देणारा व आपलासा वाटणारा पोलीस अधिकारी म्हणून  वैभववाडी तालुक्याच्या जनतेच्या हृदयात त्यांनी  आपले स्थान मिळवले आहे हे त्यांच्या स्वभावाचे विशेष म्हणावे लागेल. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणारे, जनसामान्यांच्या मनाचा हळवा कोपरा जोपासणारे अतुल जाधव  गुन्हेगारांना मात्र आपला कर्दनकाळ वाटतात.
         दि.३१ मे २०२२ रोजी वैभववाडी पोलीस ठाण्याचा यशस्वी कार्यभार संपून दि.१ जून २०२२ रोजी पासून वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या कार्यभार स्विकारला आहे. आपल्या हक्काचा पोलीस अधिकारी हि वैभववाडी तालुक्यातील जनतेच्या मनात असलेली त्यांची ओळख प्रत्येकाच्या मनात कायम अबाधित राहील यात तिळमात्र शंका नाही.

वडूज प्रतिनिधी /शरद कदम

        प्रत्येकाला आपल्या अवतीभवती अशा काही व्यक्ती  भेटतात ज्या अल्पावधीतच त्यांच्या मनामध्ये आपलं एक वेगळे स्थान निर्माण करतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे खटाव तालुक्यातील सेवागिरी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव सुवर्णनगरीतील अतुलनीय व्यक्तीमत्व व वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब. 
       पोलीस म्हटलं की सामान्य माणसाच्या मनात एक भिती व दडपण आपसूकच निर्माण होते. पण याला अपवाद म्हणजे पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब. सन- २०२० मध्ये वैभववाडी पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांनी स्विकारला. वैभववाडीत दि.२७-०७-२०२० ते दि.३१-०५-२०२२ या आपल्या कारकीर्दीत  अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याच्या ३ दिवसांत अहमदनगर येथे जात त्यांनी मुसक्या आवळल्या. तसेच अवघ्या २४ तासात २३ लाखांच्या लुटीच्या बनावटीचा त्यांनी पर्दाफाश केला तर दरोडेखोरांचा अडीच तास थरारक पाठलाग करत ९ लाखांचा मुद्देमाल त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जप्त केला होता. अशा अनेक गुन्ह्यांचा तपास अगदी शिताफीने व हुशारीने अल्पावधीतच त्यांनी लावला, खरं तर ते त्यांचे कौशल्यच म्हणावे लागेल. यावेळी वैभववाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गाचे देखील मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. वैभववाडी शहरात फिरणाऱ्या निराधार महिलेला संविता आश्रम येथे दाखल करण्यास जाधव साहेब यांचे सहकार्य लाभले होते. याशिवाय कोकीसरे रेल्वे फाटक नजिकच्या तीव्र उताराच्या वळणावर टॅंकर मधुन सांडलेल्या काकवीमुळे अपघात घडून पहाटेच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अशा वेळी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन रस्ता स्वच्छ धुवून त्यांनी वाहतूक सुरळीत केली होती. गेल्या वर्षी तर एडगाव नजिक पहाटे ट्रॅव्हल्स ला लागलेली आग दुसऱ्या दिवशी टेम्पो ट्रॅव्हल्स अपघात तिसऱ्या दिवशी नदित कोसळलेल्या कार चा अपघात अश्या अपघातांच्या मालिकांमध्ये देखील प्रवासी व स्थानिक नागरिकांना तात्काळ मदतीसह धिर देण्याचे काम त्यांनी केले आहे. पावसाळ्यात करूळ व भुईबावडा घाटात सतत दरडी कोसण्याच्या घटना घडत असताना वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ते नेहमीच सतर्क असायचे. पावसाळ्यातील पुर परिस्थिती असो किंवा वादळाने वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागात झालेले नुकसान त्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या सिमेवर करूळ- भुईबावडा येथील व  वैभववाडी तालुक्यातील एकंदरीत सर्व परिस्थिती त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली आहे. कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना जनतेला धिर व मनोधैर्य देण्याचे काम त्यांनी केले आहे. याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना कोव्हिड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे शिवाय अनेक गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे तसेच सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्था,संघटनांनी देखील वेळोवेळी त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे व नेहमीच्या धावपळीच्या कामात थोडा विरंगुळा म्हणून पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब यांनी वैभववाडी पोलीस कर्मचाऱ्यांची एक क्रिकेट टीम तयार केली त्यांच्या या टीमने मैदान देखील गाजवली आहेत. वैभववाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील तसेच जाधव साहेब यांच्या सदैव सोबत असणारे त्यांच्या गाडीचे नेहमीच सारस्थ करणारे मारुती साखरे व अन्य पोलीस कर्मचारी यांचे त्यांना नेहमी सहकार्य लाभले. अगदी वैभववाडी पोलीस ठाण्याचा कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळून वैभववाडी पोलीस ठाण्याच्या निरोप घेत असताना  सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पोलीस कॉन्स्टेबल मारूती साखरे व अजित पडवळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जाधव साहेब यांना शुभेच्छा दिल्या.
             आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक सलोखा जपण्याचे काम त्यांनी केले आहे. वैभववाडी तालुक्यातील गुन्ह्यांचा तपास व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असतानाच प्रामाणिक पोलीस कर्मचारी तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला देखील ते विसरले नाहीत. तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थां, मंडळे यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांना आपला अमूल्य वेळ देऊन ते आवर्जून उपस्थित असत. त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे तालुक्यातील युवा वर्गाकडून एक 'दबंग पोलिस अधिकारी' म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. रंगपंचमीच्या काळात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना वाभवे येथील तरुणांना त्यांच्या समवेत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. लोरे नं- २ येथे १० वर्ष स्वतः च्या मालकीच्या जागेत जाऊ न शकलेल्या मधुकर कांबळे कुटुंबीयांना जाधव साहेबांच्या माध्यमातुन न्याय मिळाला त्याबद्दल कांबळे कुटुंबीयांनी जाधव साहेब व अन्य पोलीस कर्मचारी वर्गाचा फेटा,हार,शाल घालून आरती ओवाळून सत्कार केला. यावेळी अतुल जाधव साहेब यांच्या रूपाने मला साक्षात देवच भेटला असे मत मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले. त्यांचा फोटो आपण फ्रेम करून घरी लावणार असल्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. वैभववाडी तालुक्यातील आम जनतेला  हमखास न्याय मिळवून देणारा व आपलासा वाटणारा पोलीस अधिकारी म्हणून  वैभववाडी तालुक्याच्या जनतेच्या हृदयात त्यांनी  आपले स्थान मिळवले आहे हे त्यांच्या स्वभावाचे विशेष म्हणावे लागेल. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणारे, जनसामान्यांच्या मनाचा हळवा कोपरा जोपासणारे अतुल जाधव  गुन्हेगारांना मात्र आपला कर्दनकाळ वाटतात.
         दि.३१ मे २०२२ रोजी वैभववाडी पोलीस ठाण्याचा यशस्वी कार्यभार संपून दि.१ जून २०२२ रोजी पासून वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या कार्यभार स्विकारला आहे. आपल्या हक्काचा पोलीस अधिकारी हि वैभववाडी तालुक्यातील जनतेच्या मनात असलेली त्यांची ओळख प्रत्येकाच्या मनात कायम अबाधित राहील यात तिळमात्र शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा