*शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन नाईकवाडी व मोरे कुटुंबियांनी बांधल्या रेशीम गाठी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे औच्यित साधुन दि.६ जून सोमवार रोजी उस्मानाबाद येथील छायादीप लाँन्स येथे आयोजित विवाह सोहळ्यात विवाह समारंभा पुर्वी तुळजापूरच्या नाईकवाडी कुटुंबातील वर चि.राहुल आणि उस्मानाबाद च्या मोरे कुटुंबातील नववधु आरती या नव वधुवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत लग्नाची मुहुर्त गाठ बांधली उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेगाव येथील महादेव शामराव मोरे यांची जेष्ट कन्या आरती महादेव मोरे व तुळजापुर येथील भारत रामचंद्र नाईकवाडी यांचे द्वितीय चिं राहुल भारत नाईकवाडी यांचा शुभविवाह दि.६ जुन सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला तत्पुर्वी वर राहुल व वधु आरती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन लग्नाची मुहुर्त गाठ बांधली या शुभविवाह सोहळ्यास वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील व तुळजापुर तालुक्यातील अनेक राजकीय लोकप्रतिनिधी, शिक्षक वर्ग आणि नागरीकांनी उपस्थिती लावली होती मोरे व नाईकवाडी यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा