Breaking

रविवार, ३ जुलै, २०२२

ज्ञानाचा योग्य वापर करून संपत्ती, प्रतिष्ठा व समाधान मिळवणे म्हणजेच करिअर होय.... डॉक्टर धनंजय गायकवाड 'यशोदीप'चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न...



ज्ञानाचा योग्य वापर करून संपत्ती, प्रतिष्ठा व समाधान मिळवणे म्हणजेच करिअर होय....
                         डॉक्टर धनंजय गायकवाड  'यशोदीप'चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न...



 बेंबळे ।प्रतिनिधी।                      

            आपणास मिळणाऱ्या ज्ञानाचा योग्य मार्गाने वापर करून संपत्ती प्रतिष्ठा व आत्मिक समाधान मिळवणे म्हणजेच आपले करिअर करणे होय असे प्रतिपादन लातूरच्या मैत्री इन्स्टिट्यूट चे प्रमुख व करिअर मार्गदर्शक डॉक्टर धनंजय गायकवाड यांनी केले आहे. यशोदीप एज्युकेशन व यशोदीप फाउंडेशन च्या वतीने रोटरी क्लब टेंभुर्णी येथे आयोजित केलेल्या' गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन' कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉक्टर धनंजय गायकवाड आपले विचार व्यक्त करत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैया शिंदे



यावेळी जि.प. सदस्य  बंडूनाना ढवळे, . दिलीपराव भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष . रमेश पाटील, पोलीस स्टेशनचे  सुरेश निंबाळकर,एमपीएससी मधून निवड झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, .वैभव शिंदे,सहाय्यक राज्यकर आयुक्त श्री.नितेश कदम यांचे पालक, PSI पदी निवड झालेले , अमोल भोसले, टेंभूर्णी चे PSI श्री.काशीद साहेब, नागनाथ भाऊ खटके, रावसाहेब नाना देशमुख, . विनोद पाटील सर, .राजाभाऊ खटके,शिवसेना तालुकप्रमुख .मधुकर देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष . नागेश बापू खटके, अमोल जगदाळे, नानासाहेब ढवळे.संतोष खटके,अशोक खटके , टेंभुर्णी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, हॉटेल अतिथी .सुरेश नाना ताटे, गोविंद वृध्दाश्रम चे श्री.दशरथ महाडिक, सोलापूरचे, .धनंजय मोरे,ॲड.बाळासाहेब नवले,भाऊसाहेब महाडिक, जयवंत पोळ , डॉ.मनोज काळे,.बबन भोसले सर, भाऊराव शिंदे गुरुजी, अजिनाथ शेंडे गुरुजीं,प्रदिप पाटील सर, दादासाहेब पिसाळ, निलेश देशमुख, . संतोष शिंदे, विजय खटके साहेब,दिपक खटके , सिद्धेश्वर महाडीक,.भाऊ लोहार डॉ.सुदाम कुंभार, डॉ.संजय दूपडे, श्री.अतुल सरडे,.संजय पाटील, श्रीपती खटके साहेब,. गणेश खटके, . शिवदास खटके, ,विकास अभिमान खटके, तंबवेचे सरपंच सचिन कांबळे.राजकुमार गंधले, तात्यासाहेब देशमुख, मच्चींद्रा कांबळे, . रणजित देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक . गोरख खटके सर तसेच परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    
 आदी मान्यवर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यशोदीपचे प्रमुख गोरख खटके यांनी सर्वांचे स्वागत करून खटके परिवारातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.
 डॉक्टर धनंजय गायकवाड पुढे म्हणाले की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना द्यावे, 'सायकोमेट्रिक टेस्ट'च्या माध्यमातून सध्या विद्यार्थी पुढील आयुष्यात काय करू शकतो हे निश्चित कळू शकते, ध्येयवेडी मुले इयत्ता दहावी मध्येच आपलं करिअर ठरवतात, माणसाला दुसऱ्याचे 'मन' वाचता आले पाहिजे, व्यावसायिक व राजकारणी व्यक्ती कधीच समाधानी नसतात परंतु राजकारण हे अतिशय अवघड व अभ्यासू शेत्र आहे, गुणवत्तेवर बाजी मारणारे आयुष्यात समाधानी असतात, खुद्द अपमान पचवून ध्येयाप्रती वाटचाल करतात ते जीवनात यशस्वी होतात असे प्रभावी विचार व्यक्त करून डॉक्टर गायकवाड यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना करिअर घडवण्यासाठी उदात्त ध्येय समोर ठेवून अखंड प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्ला दिला. यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांचे हस्ते दहावी बारावी विशेष गुण प्राप्त करणाऱ्या टेंभुर्णी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेले वैभव शिंदे म्हणाले की अभ्यास करताना डोळसपणे सभोवतालच्या ज्ञानाचा अभ्यास करून समन्वय साधावा तरच यशस्वी होता येते, ग्रामीण भागात टॅलेंट आहे पण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले की जिद्द, कष्ट, चिकाटी व समर्पण करून इतरांपेक्षा वेगळे प्रभावी व सकारात्मक करून दाखवल्यास जीवनात यशस्वी होता येते.
        या कार्यक्रमास खटकेपरिवार ,तांबवे ,सापटणे ,बेंबळे, इंदापूर, टेंभुर्णी, पिंपळनेर इत्यादी ठिकाणचे नागरिक, एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पालक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बेंबळे येथील प्रा. संतोष शिंदे यांनी केले तर आभार  राजाभाऊ खटके यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा