स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी उपक्रम....
श्रीगोंदा-नितीन रोही,
2022 हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे औचित्य साधुन अनेक उपक्रम वर्षभर तालुक्यात आयोजित करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणुन
तालुका विधी सेवा समिती ,
श्रीगोंदा तहसील कार्यालय,
व
गट विकास अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने
विशेष अमृत जनलाभ योजना २०२२ही तालुक्यात ८ मंडळांमध्ये दि.२३ मे २०२२ ते २६ मे २०२२ या कालावधीत मंडळ मुख्यालयी शिबीर स्वरुपात राबवण्यात आली .
यामध्ये गरजु लोकांचे ,अल्प उत्पन्न गटातील लोक ,विधवा ,वृध्द ,अनाथ ई चे फॉर्म लाभार्थ्यांच्या गावापर्यंत जाऊन भरुन घेण्यात आले.
हे फॉर्म भरून,कागदपत्रांची पूर्तता करुन तलाठींमार्फत घेण्यात आले .
या दोन्ही प्रकारच्या अर्जांची छाननी तहसिल कार्यालयात करण्यात आली .
व छानणी नंतर पात्र ठरलेल्या लाभार्थी यांना दि.१८ अॉगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सप्ताहात स्वराज्य महोत्सवाच्या सांगता प्रसंगी समारंभ पुर्वक प्रदान करण्याचा कार्यक्रम श्रीगोंदा दिवाणी न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश मा.एम.एस .शेख , श्रीगोंदा _पारनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी श्री.सुधाकर भोसले सर व श्रीगोंदा तहसिलदार श्री.मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला .
यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना ,इंदिरा गांधी योजना )यांच्या एकुन ४२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला ,तसेच अन्न सुरक्षा योजनेचे साधारणतः ४५० पात्र लाभार्थी पैकी ९३ लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणुन अन्नधान्य योजनेचा लाभ सुरु करणे बाबतचे पत्र देण्यात आले.
अन्न सुरक्षा योजनेच्या आणखी लाभार्थी यांचे छाननणीचे काम सुरू असुन त्यांना लाभा बाबत पत्रे लवकरच दिले जातील.
तरी अद्यापही गरजु ,वंचित जे लाभार्थी असतील त्यांनी आपल्या तलाठी यांच्याशी योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह संपर्क करवा असे आव्हान तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी केली.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा