शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम
शंकराव मोहिते महाविद्यालयाचा अनोखा
भारत देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर झेंडा या भारत सरकारच्या उपक्रमाची माहिती प्रत्येक नागरिकांना पोहोचावी व 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सर्वांनी आपल्या घरावरती तिरंगा झेंडा उभारावा म्हणून शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक आणि संस्कृतीला जोपासत वासुदेवाच्या रूपामध्ये घरोघरी जाऊन जनजागृती व हर घर झेंडा या उपक्रमाची माहिती देऊन सर्वांचे प्रबोधन केले
व नागरिकांनी आपल्या घरावरती झेंडा उभारण्याचे आवाहन केले त्याचबरोबर लावलेला तिरंगा हा व्यवस्थित आणि चांगला असला पाहिजे आणि तो उतरवल्यानंतर त्याचा कोणत्याही पद्धतीने होता व सुरक्षित ठेवला पाहिजे असे ही आव्हान नागरिकांना केले प्रबोधन करण्यासाठी सत्यजित चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा