Breaking

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

उजनी धरणामुळे महाराष्ट्र समृद्ध ; परंतु धरणग्रस्त हक्कापासून वंचित - स्वाती ताई पाटीलगौरी गणपतीच्या सजावटी मधून धरणग्रस्तांच्या मांडल्या व्यथा


उजनी धरणामुळे महाराष्ट्र समृद्ध ; परंतु धरणग्रस्त हक्कापासून वंचित - स्वाती ताई पाटील


गौरी गणपतीच्या सजावटी मधून धरणग्रस्तांच्या मांडल्या व्यथा 

भिमानगर (प्रतिनिधी) धनंजय भोसले 

************************************

माढा तालुक्यातील उजनी (भिमानगर) येथील शुभदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ स्वाती ताई पाटील यांनी गौरी गणपतीच्या समोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसह उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केला आहे. 


उजनी धरणामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला, परंतु धरणग्रस्त हक्कापासून वंचित राहिला.
इतिहास घडवणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना न्याय देतील का? अशा भावना स्वातीताई पाटील यांनी गौरी गणपतीच्या समोर देखाव्यातून धरणग्रस्त शेतकऱ्यांविषयी भावना व्यक्त केल्या.
व धरणग्रस्तांच्या व्यथा शिंदे सरकारने सोडवाव्यात, अशी सद्बुद्धी मिळो म्हणुन गौरी गणपतीला साखडे घातले आहे.
गौरी गणपतीच्या सजावटीमधून धरणग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करून एक आगळा वेगळा देखावा केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कवतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा