* * तेजस अनवते ची आयआयटी साठी निवड *
बेंबळे ।प्रतिनिधी।
बेंबळे येथील मध्यम शेतकरी कुटुंबातील तेजस दीपक अनवते या 19 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रौद्योगिक संस्थान (आयआयटी) साठी निवड झालेली आहे. देश पातळीवर होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेसाठी (एंट्रन्स एक्झामिनेशन) सोलापूर केंद्रातून तेजस याने परीक्षा दिलेली होती. नुकताच परीक्षेचा रिझल्ट लागलेला असून तेजस ची निवड झालेली असल्याचा संदेश (मेसेज) त्यास मिळाला आहे.
तेजस अनवते चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेंबळे येथील जिल्हा परिषद शाळा व विमलेश्वर विद्यालयात झाले आहे. टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयातून इयत्ता दहावी तर तेथीलच रयत शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ विज्ञान कॉलेजमधून तेजस चांगल्या मार्गाने बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे, इयत्ता बारावी साठी फिजिक्स, केमेस्ट्री ,आणि मॅथ्स हे त्याचे विषय होते. बारावी नंतर तेजसने आयआयटी निवड चाचणी परीक्षेचा अतिशय एकाग्रतेने व नेटाने अभ्यास केला व त्यामध्ये आज तो चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेला आहे .विशेष म्हणजे या परीक्षेच्या अभ्यासासाठी तेजसने कोणताही क्लास लावलेला नव्हता, घरी बसूनच संबंधित वरीष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तेजसने अभ्यास केला होता व आज त्यास यामध्ये घवघवीत यश मिळाले आहे हे विशेष. पवई (मुंबई), दिल्ली, खरकपूर (पश्चिम बंगाल) किंवा गोहाटी (आसाम) या ठिकाणी असलेल्या कोणत्याही शासकीय कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागणार असल्याचे भारतीय औद्योगिक संस्थांनतर्फे तेजसला कळविण्यात आले आहे. चार वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर तेजसला बी. टेक. (आयआयटी) ही पदवी प्राप्त होणार असून येथील प्राध्यापक, शिक्षक ,अनेक प्रतिष्ठित मान्यवर व हितचिंतक यांचेकडून तेजस ला भावी शिक्षणासाठी व कारकीर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तेजसचे आई वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कोणताही क्लास न लावता स्वकष्टाने तेजसने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील जिज्ञासू विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार हे निश्चित. *बेंबळे ।प्रतिनिधी। फोटो
बेंबळे येथील मध्यम शेतकरी कुटुंबातील तेजस दीपक अनवते या 19 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रौद्योगिक संस्थान (आयआयटी) साठी निवड झालेली आहे. देश पातळीवर होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेसाठी (एंट्रन्स एक्झामिनेशन) सोलापूर केंद्रातून तेजस याने परीक्षा दिलेली होती. नुकताच परीक्षेचा रिझल्ट लागलेला असून तेजस ची निवड झालेली असल्याचा संदेश (मेसेज) त्यास मिळाला आहे.
तेजस अनवते चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेंबळे येथील जिल्हा परिषद शाळा व विमलेश्वर विद्यालयात झाले आहे. टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयातून इयत्ता दहावी तर तेथीलच रयत शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ विज्ञान कॉलेजमधून तेजस चांगल्या मार्गाने बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे, इयत्ता बारावी साठी फिजिक्स, केमेस्ट्री ,आणि मॅथ्स हे त्याचे विषय होते. बारावी नंतर तेजसने आयआयटी निवड चाचणी परीक्षेचा अतिशय एकाग्रतेने व नेटाने अभ्यास केला व त्यामध्ये आज तो चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेला आहे .विशेष म्हणजे या परीक्षेच्या अभ्यासासाठी तेजसने कोणताही क्लास लावलेला नव्हता, घरी बसूनच संबंधित वरीष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तेजसने अभ्यास केला होता व आज त्यास यामध्ये घवघवीत यश मिळाले आहे हे विशेष. पवई (मुंबई), दिल्ली, खरकपूर (पश्चिम बंगाल) किंवा गोहाटी (आसाम) या ठिकाणी असलेल्या कोणत्याही शासकीय कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागणार असल्याचे भारतीय औद्योगिक संस्थांनतर्फे तेजसला कळविण्यात आले आहे. चार वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर तेजसला बी. टेक. (आयआयटी) ही पदवी प्राप्त होणार असून येथील प्राध्यापक, शिक्षक ,अनेक प्रतिष्ठित मान्यवर व हितचिंतक यांचेकडून तेजस ला भावी शिक्षणासाठी व कारकीर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तेजसचे आई वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कोणताही क्लास न लावता स्वकष्टाने तेजसने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील जिज्ञासू विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा