Breaking

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

उर्वरित ऊस बिल द्या.. नाहीतर सदगुरू श्री श्री साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही /स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक


उर्वरित ऊस बिल द्या.. नाहीतर सदगुरू श्री श्री साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही /स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक



पिलीव प्रतिनिधी-प्रमोद भैस


 सोलापूर ,सांगली व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर सुरू केलेल्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी च्या सदगुरू श्री श्री साखर कारखान्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर ,सांगली जिल्ह्यातील आटपाडी सातारा जिल्ह्यातील माण आदी भागातील ऊस गाळप केला असून ऊस गाळप करीत असताना शेतकऱ्यांना प्रति टन 2660/-रुपये बिल देतो असे आश्वासनही दिले अशा आशयाच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2437 /- रुपये प्रति टन एवढेच बिल अदा केले यामुळे बुधवार दि 21 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर ठिया आंदोलन करून कारखाना प्रशासनाला उर्वरित 223 /- रुपयेसाठी धारेवर धरले.या कारखान्याने मार्च महिन्यानंतर गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रती टन शंभर रुपये ज्यादा दर देणार असल्याचे परीपत्रक काढुन जाहीर केले होते याविषयी सुद्धा कारखान्याने अद्यापही कोणतीही प्रतीक्रिया दिली नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

 सदगुरू श्री श्री साखर    कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी येताच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी गेट बंद केले याच ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी सुरू करताच कारखान्याचे जनरल मॅनेजर पाल यांनी या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची भेट घेतली व कारखान्याच्या प्रशासनाबरोबर येत्या आठ दिवसात चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सदगुरू श्री श्री श्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना एक निवेदन देण्यात आले असून आपण सन 2021- 22 च्या मागील हंगामात ऊस गाळप करीत असताना 2660/- दर जाहीर केल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या विश्वासावर कारखान्याला ऊस दिला परंतु प्रत्यक्षात आपण त्या शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांना फक्त 2437/- रुपये एवढाच दर दिला आहे उर्वरित ऊस बिल  शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनाची असेल असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकधक्ष अजित बोरकर ,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील ,जेष्ठ नेते मगन काळे, कार्याध्यक्ष सचिन आटकळे समाधान काळे ,अहिल पठाण ,निवास नागणे, प्रवीण नागणे, दत्तात्रय नागणे, पांडुरंग नागणे, शहाजी  नागणे पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

           नाव मोठं लक्षण खोटं
सद्गुरु श्री श्री  कारखान्याच्या चेअरमनसह सर्व संचालक मंडळ एका मोठ्या आध्यात्मिक गुरूंचे शिष्य असून त्यांच्या नावातील काही अक्षरे वापरून हा कारखाना सुरू केला यामुळे यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी ऊस घातला मात्र खोटं बोल पण रेटून बोल अशा उक्तीप्रमाणे कारखाना प्रशासन शेतकऱ्यांबरोबर वागत आहे जर का राजेवाडीच्या या सदगुरू श्री  श्री श्री कारखान्याने शेतकऱ्यांचे उर्वरित 223/- रुपये ऊस बिल दिले नाही तर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही याची जाण कारखान्याच्या चेअरमन सह सर्व संचालक मंडळांनी ठेवावी .

अजित बोरकर ,माळशिरस तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना


चौकट:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी

याविषयी कारखान्याचे एच आर अडमीन खटके यांना ऊस दराबाबत विचारले असता आम्ही शासनाच्या धोरणाप्रमाणे एफ आर पी ची रक्कम दिली आहे. मात्र तुम्ही गत हंगामात २६६० रुपये दर जाहीर केला होता.आणि मार्च नंतर गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतीटन १०० रुपये ज्यादा दर देणार होता याविषयी विचारले असता लवकरच संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये योग्य निर्णय होईल असे सांगितले तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा