जी .डी . बापूंनी जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे - प्रसाद कुलकर्णी .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी / धनंजय मोरे
ब्रिटिश साम्राज्यशाही प्रमाणेच गुन्हेगारी, दरोडेखोरी ,सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची जून १९४३ मध्ये स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते.त्या प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली.ते आघाडीवरील योद्धे होते. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून
विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय यांच्या वतीने क्रांतीअग्रणी डॉ . जी . डी . बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त ' क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी .बापू लाड यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान ' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बबनराव शिंदे होते . यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे , विधान परिषद सदस्य अरुण आण्णा लाड , माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज दादा शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदज , जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर , भारत आबा शिंदे , तुकाराम ढवळे , रयत शिक्षण संस्था संचालक बाळासाहेब पाटील , वामनराव उबाळे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डिग्रजे , प्रा . राजेंद्र दास , डॉ. महेंद्र कदम , सुहास पाटील , संचालक प्रभाकर कुटे , रमेश येवले , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रमेश पाटील , रामभाऊ शिंदे , शिवाजी डोके , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील आदी उपस्थित होते .
प्रास्ताविक व स्वागत डॉ महेंद्र कदम यांनी केले . यावेळी प्रा . राजेंद्र दास यांनी मनोगत व्यक्त केले .
आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले की , प्रतिसरकारच्या काळामध्ये क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी वयाच्या वीस ते पंचवीशीत जे काम केले ते अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचे होते.तन-मन धन अर्पण करत प्रतिसरकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढा प्राणाची पर्वा न करता ते आपल्या सहकाऱ्यांसहित कार्यरत राहिले.अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ती उर्मी आजच्या तरुणांनाही अंगीकारण्याची गरज आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले, पुढच्या पिढीला मागच्या पिढीतील लोकांनी काय केले , हे कळलं पाहिजे . सांगली , सातारा , कोल्हापूर या भागात जी.डी. बापू लाड यांचे कार्य मोठे होते , स्वातंत्र्य आंदोलनाचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा इतिहास अतिशय महत्वाचा आहे.नव्या पिढीला हा प्रेरणादायी वसा आणि वारसा सांगणे गरजेचे आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना आणखी पंचवीस वर्षांनी जेंव्हा स्वातंत्र्याची शताब्दी होईल तेंव्हाचा भारत सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठी हा वारसा नव्या पिढीत रुजविण्याचे काम सर्वानी केले पाहिजे.
यापुढे बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची 'महाराष्ट्राचे शिल्पकार ' या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती,पाणी,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिले. आपल्या भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य आंदोलन,प्रतिसरकार , डॉ.जी. डी. बापूंचे कार्य आणि वर्तमान काळात त्याचे महत्त्व याची सवित्तर व सखोल मांडणी केली.
सुत्रसंचलन रविंद्र जाधव , प्रा . दिगंबर वाघमारे , संजय साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा